शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

त्यावेळी स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही?, बंडू हर्णे यांचा सतीश सावंतांना सवाल

By सुधीर राणे | Updated: March 22, 2023 12:44 IST

सतीश सावंत यांना आजवर मिळालेली सर्व पदे ही राणेंमुळेच

कणकवली: कणकवली शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने स्टॉल हटाव मोहिम राबवली आहे. तर ज्यांचे हातावर पोट आहे त्या भाजीविक्रेते आणि स्टॉलधारकांना गेल्या चार वर्षात आधार देण्याचे काम नगरपंचायतीनेच केले आहे. त्याची जाणीव त्यांना नक्कीच आहे. परंतू सत्तेत असताना सतीश सावंत व शिवसेनेच्या मंडळींनी अडचणीच्या काळात स्टॉलधारकांचे अश्रु पुसण्याचे औदार्य का दाखवले नाही? असा सवाल कणकवलीचे उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी केला. कणकवली येथील स्टॉलधारकांच्या प्रश्नाबाबत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केलेल्या आरोपांना बंडू हर्णे यांनी कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, महामार्ग प्राधिकरणने न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टॉलधारकांवर कारवाई केली आहे.असे असताना त्याचे खापर आमदार नितेश राणे आणि नगरपंचायतवर फोडण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र, त्यावर स्टॉलधारक विश्वास ठेवणार नाहीत.स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणे जशी आमची जबाबदारी होती, तशी तुमचीही जबाबदारी नव्हती का? सत्ता असताना तुम्ही काय केले?  त्यावेळी सतीश सावंत, संदेश पारकर आदी मंडळींनी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेवून कणकवली बसस्थानकाची पुनर्बांधणी करून  स्टॉलधारकांना पुनर्वसनाचे गाजर दाखवले होते. त्याबाबतचा एकतरी कागद पुढे हलला काय?  स्टॉलधारकांच्या प्रश्नांची आम्हाला जाणीव आहे. लोकवस्ती आणि बाजारपेठेचा विचार करून आहे त्या परिस्थितीत तोडगा काढून त्यांना प्रस्थापित करावे लागेल. याबाबत आमदार, नगराध्यक्ष व आमचे सहकारी नगरसेवक हे एकत्रितपणे योग्य तो निर्णय घेवून लवकरच मार्ग काढतील. मात्र, संचयनीच्या ठेवीदारांचा प्रश्न जे २० वर्षात सोडवू शकले नाहीत ते दोन दिवसांत स्टॉलधारकांचा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा कशी काय करतात? असा प्रश्नही हर्णे यांनी उपस्थित केला.ते म्हणाले, सतीश सावंत यांना आजवर मिळालेली सर्व पदे ही राणेंमुळेच मिळाली आहेत. त्यावेळी राणेंना सावंत यांनी किती कमिशन दिले होते? हे जनतेसमोर त्यांनी जाहीर करावे. राणेंची साथ सोडल्यानंतर नेमके काय होते हे सावंत यांनी जिल्हा बँक निवडणुकीत अनुभवले आहे. आम्हाला महामार्ग ठेकेदाराचे हित जोपासायचे असते तर शेडेकर यांच्यावर चिखलफेक झाली नसती. महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आम्ही सहकार्य केले आहे. रस्त्यांचा दर्जा टिकण्यासाठीच बीबीएम ऐवजी बीएमने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कणकवली नगरपंचायतीमार्फत झालेली सर्व कामे दर्जेदार आहेत.त्यामुळे शहरातील एकतरी काम निकृष्ठ असल्याचे सावंत यांनी दाखवून द्यावे. असेही बंडू हर्णे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण