शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नगरपंचायत स्थापन केलीच कशाला ?

By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST

संतप्त पदाधिकाऱ्यांकडून ताशेरे : दोडामार्गात मुख्याधिकाऱ्यांअभावी बैठक तहकूब

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची मंगळवारी आयोजित केलेली खास बैठक प्रभारी मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्याने तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली. प्रशासन जर कर्मचारीवर्ग आणि अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात असमर्थ होते. तर नगरपंचायत स्थापन केलीच कशाला? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित करत मुजोर प्रशासनाचा पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला. तसेच जून अखेरपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त न केल्यास उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची खास बैठक मंगळवारी नगरपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्ष साक्षी कोरगावकर, बांधकाम सभापती संतोष म्हावळंकर, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, चेतन चव्हाण, राजेश प्रसादी, दिवाकर गवस, अरूण जाधव, सुधीर पनवेलकर, प्रमोद कोळेकर, उपमा गावडे, हर्षदा खरवत, विनया म्हावळंकर, संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीस प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे वेंगुर्लेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे अनुपस्थित राहिल्याने ही सभा तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्ष नानचे यांच्यावर आणि पर्यायाने इतर नगरसेवकांवर आली. मुख्याधिकाऱ्यांच्या अशा कार्यपध्दतीमुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन कसई-दोडामार्ग नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यास आणि इतर कर्मचारीवर्ग भरण्यास जर असमर्थ होते, तर नगरपंचायत स्थापन केलीच का, असा सवाल उपस्थित करत मुजोर प्रशासनाचा निषेध केला. यावेळी नानचे यांनी सध्याचे प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यावर आमचा व्यक्तीद्वेष नाही. आमचा राग प्रशासनावर आहे. जर आज आवश्यक कर्मचारी वर्ग प्रशासनाने भरला असता व कायमस्वरूपी अधिकारी दिले असते, तर अशी सभा तहकूब करण्याची वेळ आली नसती, असे संतोष नानचे म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांसाठी सत्ताधारी-विरोधक एकत्रकसई-दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे दोन, सेना-भाजपाचे प्रत्येकी पाच व मनसेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. सध्या नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असली, तरी बहुमत मात्र काठावरच आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या इतर बैठकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सर्रास नेहमीच खडाजंगी उडाल्याची उदाहरणे अनेकवेळा घडली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक मंगळवारी एकत्र आल्याचे चित्र अपवादाने पहायला मिळाले. शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याच्या दोहोंच्या या भूमिकेचे दोडामार्ग शहरवासियांमधून स्वागत होत आहे.