शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे कोणत्या पक्षाकडून लढणार? शिवसेनेसह विरोधक कोंडी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 06:06 IST

गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली.

- महेश सरनाईकसिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात आमदार नीतेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षातील असतानादेखील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड आणि वैयक्तिक निधीतून विविध विकासकामे केली. ते मतदारसंघात सतत सक्रिय असल्याने आमदारकीच्यानंतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये येथील जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून लढणारे नीतेश राणे यावेळी स्वाभिमान की भाजप कुठल्या पक्षातून लढणार याचीच प्रतीक्षा आहे. तर राणेंना पराभूत करण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांचे सर्व राजकीय विरोधक प्रयत्न करणार आहेत.२०१४ च्या निवडणुकीत कणकवलीतून नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतंत्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. या पक्षाने केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राणे यांची भाजपने आपल्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लावली. त्यानंतर गेल्या दीड वर्षात नीतेश राणे यांनी मात्र, काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे अजूनही ते काँग्रेसचेच आमदार आहेत.आता भविष्यात स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण करणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले आहे. मात्र, याला शिवसेनेने विरोध केल्याने शिवसेना-भाजप युतीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा दिवसांत याबाबतची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर नीतेश राणे भाजपमधून लढणार की स्वाभिमानमधून हे स्पष्ट होईल.नीतेश राणे कुठल्याही पक्षातून लढले तरी शिवसेनेचा त्यांना विरोध असणारच आहे. शिवाय, राष्टÑवादीसह इतरांची साथही सेनेला मिळू शकते.पाच वर्षांत काय घडले?आमदार झाल्यानंतर त्यावेळी स्थापन झालेल्या वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले.त्यानंतर देवगड आणि पाठोपाठ कणकवली नगरपंचायतीवरही ताबा मिळवून मतदारसंघातील तिन्ही नगरपंचायतींवर काँग्रेस आणि नंतर स्वाभिमानचा झेंडा फडकविला.जिल्हा परिषद निवडणुकीत कणकवली तालुक्यात आठही सदस्य निवडून आणत एकतर्फी वर्चस्व मिळविले.लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ कणकवली मतदार संघातूनच दहा हजारांचे मताधिक्य मिळाले. ते केवळ नीतेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचेच फळ होते.>निवडणूक २०१४ंनीतेश राणे (काँग्रेस)७४७१५ मतेप्रमोद जठार (भाजप)३८७३६ मतेसुभाष मयेकर (शिवसेना)१२८६३ मते>संभाव्य प्रतिस्पर्धीसंदेश पारकर (भाजप)अतुल रावराणे (भाजप)विजय सावंत (काँग्रेस)अभिनंदन मालंडकर (राष्ट्रवादी)>विरोधी पक्षातील आमदार असूनदेखील केवळ निधीबाबत ऊहापोह न करता विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मतदारसंघात डिजिटल शाळांचा उपक्रम राबविला. तसेच स्व-खर्चातून क्रिकेट अकादमी, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम यासारखे उपक्रम राबवून लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदारसंघ

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे