शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

ज्यात-त्यात अभियान -

By admin | Updated: March 18, 2016 23:20 IST

कोकण किनारा

सरकारी यंत्रणा असो किंवा सर्वसामान्य माणसे असोत, आपली कामे नियमित वेळेत किंवा नियमात करत नसल्यानेच आता प्रत्येक गोष्टीसाठी अभियान राबवण्याची वेळ आली आहे. पाहावे तेव्हा कुठले ना कुठले अभियान सुरू होत असते. राजकारणी लोक त्या अभियानाचे उद्घाटन करतात, काही दिवस त्यावर चर्चा होत राहतात आणि आपण पुन्हा दुसऱ्या अभियानासाठी सिद्ध होतो. कुठल्याही विकासासाठी किंवा प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे ती जागरूक समाजाची. दुर्दैवाने आपल्याकडे त्याचाच अभाव आहे. श्रीमंत माणसांची अजून श्रीमंत होण्याची आणि गरीब माणसांची दोनवेळचे पोट भरण्याची स्पर्धा दिवस-रात्र सुरू आहे. त्यामुळे समाज म्हणून विचार करण्यास कोणालाही वेळ नाही. म्हणूनच पाणी वाचवण्यासाठी जल अभियान सुरू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकार आणि जनता दोघेही निद्रिस्त असल्याने प्रगतीचा गाडा तसूभरही पुढे सरकत नाही, हे आपल्या समाजाचे चित्र आहे.कधी पहावे तर एस्. टी.चा सौजन्य सप्ताह असतो, कधी सुरक्षा सप्ताह असतो. ज्या गोष्टी नियमित होणे अपेक्षित आहे, त्या गोष्टींसाठी फक्त सप्ताह का पाळावे लागतात, हा प्रश्नच आहे. एस. टी. असो किंवा कोणतीही सार्वजनिक व्यवस्था असो तिथे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या ग्राहक/प्रवाशांनी एकमेकांशी सौदार्हपूर्ण व्यवहार करणे कायमच अपेक्षित आहे. त्यासाठी सप्ताहाची गरज काय? रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी सप्ताह कशासाठी? वाहन चालवताना स्वत:ची आणि आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी तितक्याच प्राधान्याने घेणे गरजेचे आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताह असेल, आरोग्य सप्ताह असेल, असे सप्ताह करण्याची वेळ का यावी? औद्योगिक क्षेत्रात कायमची सुरक्षितता पाळली गेली तर त्यातून अनेक कर्मचाऱ्यांचे जीव वाचणार नाहीत का?आता नव्याने सुरू झाला आहे तो, जलजागृती सप्ताह. त्याचीही जागृती करावी लागते, ही बाब खटकणारी तर आहेच, पण त्याचबरोबर लाजीरवाणीही आहे. दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. अनेक उपाययोजना राबवूनही उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. अगदी मोठ्या शहरातही एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकर गावात जातो तेव्हा रिकामे हंडे, कळशा, बादल्या त्यांची वाटच पहात असतात. अशी परिस्थिती प्रत्यक्ष आपल्या स्वत:वर आली नाही, तरी त्याची कल्पना आपल्याला असते. आपल्या आसपासच्या अनेक भागांमध्ये आपले मित्र, नातेवाईक अशा परिस्थितीला सामोरे जात असल्याचेही आपल्याला माहिती असते. पण तरीही आपल्याला पाण्याचे महत्त्व सांगावे लागते. जलजागृती अभियान राबवावे लागते.ही असली अभियाने राबवण्याची वेळ सरकारवर येते, याला कारण समाज खूप आत्मकेंद्री झाला आहे. आपल्यापलिकडे पाहण्याची वृत्तीच नाहीशी झाली आहे. मी आणि माझा परिवार एवढीच आपली संकल्पना झाली आहे. ‘मला पुरेसे पाणी आहे ना?’, ‘माझ्या विहिरीत भरपूर पाणी आहे मग मी पाण्याचा जास्त वापर केला तर काय झाले?’, ‘मी पाणी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरणारच आहे. मग मी का वापरू नये?’, अशा प्रकारची अनेक विधाने स्पष्टीकरण म्हणून ऐकायला मिळतात, तेव्हा हेच लक्षात येते की, आपण फक्त आत्मकेंद्री आहोत.खरेतर सरकारने राबवलेले प्रत्येक अभियान हे कसे वागावे, याचे धडे देणारे आहे. असे धडे आपल्या समाजाला द्यावे लागतात, हेच दुर्दैव आहे. पाण्याचा वापर कसा करावा? किमान पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा वापर कसा करावा, हे आपल्याला सांगायची वेळ का यावी? वाहन चालवताना स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या, हे सांगण्यासाठी अभियान का राबवावे लागते? समाज साक्षर होत चालला असला, तरी सुशिक्षितपणाचे स्थानक अजूनही खूप लांब आहे, असेच यावरून दिसते. खरेतर सर्वसामान्य किंबहुना आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरील लोकांमध्ये अशा प्रकारच्या जागृतीची गरज नसते. कारण अशा लोकांकडे पाण्याची उपलब्धताच मुळात कमी असते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ त्यांच्यावर नेहमीच असते. पाण्याचे मोल त्यांना सांगावेच लागत नाही. ही वेळ येते उच्च आर्थिक स्तरातील लोकांसाठी. पाण्याचा अतिवापर हा त्याच वर्गात अधिक होतो. अपार्टमेंट संस्कृतीत तर पाण्याच्या वापराला खूपदा निर्बंध राहत नाहीत. सोसायटीचे पाणी मी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरेलच, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मुळात सुधारणा आपल्या प्रत्येकामध्ये होणे गरजेचे आहे. चांगल्या वर्तणुकीसाठी सरकारकडून अभियान राबवण्याची वेळ येऊ नये. अशी अभियाने म्हणजे सरकारी अधिकारी-कर्मचारी यांचा वेळ घालवणारी असतात. या अभियानांच्या जाहिरातीवर सरकारचा मोठा पैसा खर्च होतो. त्याच्या कार्यक्रमांवर मोठा खर्च होतो. हा सगळा तुमचा आमचाच पैसा आहे. अशा अभियानांमधून काही लोकांचे उखळ पांढरे होते, हा भाग वेगळाच. पण योग्य वागण्याची शिकवण देणारी अभियाने राबवायची वेळ सरकारवर येणे ही बाबच आपल्या अशिक्षितपणावर शिक्कामोर्तब करते. अशा अभियानांचे फलित काय, हा तर स्वतंत्र स्तंभाचा आणि संशोधनाचाच विषय!मनोज मुळ््ये