शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ज्यात-त्यात अभियान -

By admin | Updated: March 18, 2016 23:20 IST

कोकण किनारा

सरकारी यंत्रणा असो किंवा सर्वसामान्य माणसे असोत, आपली कामे नियमित वेळेत किंवा नियमात करत नसल्यानेच आता प्रत्येक गोष्टीसाठी अभियान राबवण्याची वेळ आली आहे. पाहावे तेव्हा कुठले ना कुठले अभियान सुरू होत असते. राजकारणी लोक त्या अभियानाचे उद्घाटन करतात, काही दिवस त्यावर चर्चा होत राहतात आणि आपण पुन्हा दुसऱ्या अभियानासाठी सिद्ध होतो. कुठल्याही विकासासाठी किंवा प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे ती जागरूक समाजाची. दुर्दैवाने आपल्याकडे त्याचाच अभाव आहे. श्रीमंत माणसांची अजून श्रीमंत होण्याची आणि गरीब माणसांची दोनवेळचे पोट भरण्याची स्पर्धा दिवस-रात्र सुरू आहे. त्यामुळे समाज म्हणून विचार करण्यास कोणालाही वेळ नाही. म्हणूनच पाणी वाचवण्यासाठी जल अभियान सुरू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकार आणि जनता दोघेही निद्रिस्त असल्याने प्रगतीचा गाडा तसूभरही पुढे सरकत नाही, हे आपल्या समाजाचे चित्र आहे.कधी पहावे तर एस्. टी.चा सौजन्य सप्ताह असतो, कधी सुरक्षा सप्ताह असतो. ज्या गोष्टी नियमित होणे अपेक्षित आहे, त्या गोष्टींसाठी फक्त सप्ताह का पाळावे लागतात, हा प्रश्नच आहे. एस. टी. असो किंवा कोणतीही सार्वजनिक व्यवस्था असो तिथे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या ग्राहक/प्रवाशांनी एकमेकांशी सौदार्हपूर्ण व्यवहार करणे कायमच अपेक्षित आहे. त्यासाठी सप्ताहाची गरज काय? रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी सप्ताह कशासाठी? वाहन चालवताना स्वत:ची आणि आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी तितक्याच प्राधान्याने घेणे गरजेचे आहे. औद्योगिक सुरक्षा सप्ताह असेल, आरोग्य सप्ताह असेल, असे सप्ताह करण्याची वेळ का यावी? औद्योगिक क्षेत्रात कायमची सुरक्षितता पाळली गेली तर त्यातून अनेक कर्मचाऱ्यांचे जीव वाचणार नाहीत का?आता नव्याने सुरू झाला आहे तो, जलजागृती सप्ताह. त्याचीही जागृती करावी लागते, ही बाब खटकणारी तर आहेच, पण त्याचबरोबर लाजीरवाणीही आहे. दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. अनेक उपाययोजना राबवूनही उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. अगदी मोठ्या शहरातही एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टँकर गावात जातो तेव्हा रिकामे हंडे, कळशा, बादल्या त्यांची वाटच पहात असतात. अशी परिस्थिती प्रत्यक्ष आपल्या स्वत:वर आली नाही, तरी त्याची कल्पना आपल्याला असते. आपल्या आसपासच्या अनेक भागांमध्ये आपले मित्र, नातेवाईक अशा परिस्थितीला सामोरे जात असल्याचेही आपल्याला माहिती असते. पण तरीही आपल्याला पाण्याचे महत्त्व सांगावे लागते. जलजागृती अभियान राबवावे लागते.ही असली अभियाने राबवण्याची वेळ सरकारवर येते, याला कारण समाज खूप आत्मकेंद्री झाला आहे. आपल्यापलिकडे पाहण्याची वृत्तीच नाहीशी झाली आहे. मी आणि माझा परिवार एवढीच आपली संकल्पना झाली आहे. ‘मला पुरेसे पाणी आहे ना?’, ‘माझ्या विहिरीत भरपूर पाणी आहे मग मी पाण्याचा जास्त वापर केला तर काय झाले?’, ‘मी पाणी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरणारच आहे. मग मी का वापरू नये?’, अशा प्रकारची अनेक विधाने स्पष्टीकरण म्हणून ऐकायला मिळतात, तेव्हा हेच लक्षात येते की, आपण फक्त आत्मकेंद्री आहोत.खरेतर सरकारने राबवलेले प्रत्येक अभियान हे कसे वागावे, याचे धडे देणारे आहे. असे धडे आपल्या समाजाला द्यावे लागतात, हेच दुर्दैव आहे. पाण्याचा वापर कसा करावा? किमान पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा वापर कसा करावा, हे आपल्याला सांगायची वेळ का यावी? वाहन चालवताना स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या, हे सांगण्यासाठी अभियान का राबवावे लागते? समाज साक्षर होत चालला असला, तरी सुशिक्षितपणाचे स्थानक अजूनही खूप लांब आहे, असेच यावरून दिसते. खरेतर सर्वसामान्य किंबहुना आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरील लोकांमध्ये अशा प्रकारच्या जागृतीची गरज नसते. कारण अशा लोकांकडे पाण्याची उपलब्धताच मुळात कमी असते. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ त्यांच्यावर नेहमीच असते. पाण्याचे मोल त्यांना सांगावेच लागत नाही. ही वेळ येते उच्च आर्थिक स्तरातील लोकांसाठी. पाण्याचा अतिवापर हा त्याच वर्गात अधिक होतो. अपार्टमेंट संस्कृतीत तर पाण्याच्या वापराला खूपदा निर्बंध राहत नाहीत. सोसायटीचे पाणी मी वापरले नाही तर दुसरा कोणीतरी वापरेलच, अशी भावना अनेकांच्या मनात असते. मुळात सुधारणा आपल्या प्रत्येकामध्ये होणे गरजेचे आहे. चांगल्या वर्तणुकीसाठी सरकारकडून अभियान राबवण्याची वेळ येऊ नये. अशी अभियाने म्हणजे सरकारी अधिकारी-कर्मचारी यांचा वेळ घालवणारी असतात. या अभियानांच्या जाहिरातीवर सरकारचा मोठा पैसा खर्च होतो. त्याच्या कार्यक्रमांवर मोठा खर्च होतो. हा सगळा तुमचा आमचाच पैसा आहे. अशा अभियानांमधून काही लोकांचे उखळ पांढरे होते, हा भाग वेगळाच. पण योग्य वागण्याची शिकवण देणारी अभियाने राबवायची वेळ सरकारवर येणे ही बाबच आपल्या अशिक्षितपणावर शिक्कामोर्तब करते. अशा अभियानांचे फलित काय, हा तर स्वतंत्र स्तंभाचा आणि संशोधनाचाच विषय!मनोज मुळ््ये