शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

विकासाच्या घोषणाशिवाय काय केले?, रूपेश राऊळांचा मंत्री केसरकरांना सवाल 

By अनंत खं.जाधव | Updated: March 17, 2023 17:44 IST

जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय

सावंतवाडी : कोणतेही सरकार आले तरी रस्ते पाणी हा विकास होतच राहतो. पण तुम्ही मंत्री होऊन आठ महिने झाले एक तरी भरीव विकास काम दाखवून द्या. मल्टिस्पेशालिटी रूग्णालय तसेच सुरक्षा मंडळ, बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी, बस स्थानक यांचे काय झाले. येथील जनतेने विकासाच्या नावावर गप्पा ऐकायच्या का? असा सवाल शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांना केला आहे.येत्या आठ दिवसात केसरकर यांच्या विकास कामांचा पंचनामा करू अन्यथा रस्त्यावर उतरू. जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय असल्याचे राऊळ यांनी सांगितले आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, रश्मी माळवदे, सुनिता राऊळ, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.राऊळ म्हणाले, खोटं-नाटं करून मंत्रिपदे मिळविलेल्या केसरकरांनी गेल्या पंधरा वर्षात काहीही केले नाही. उलट आमदार नाईक यांनी मंत्री पदाची अपेक्षा न ठेवता बरीचशी विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन केसरकारांनी आता तरी आपल्या मतदारसंघाचा विकास करावा, केसरकारांनी केवळ भूमिपूजनाचे नारळ फोडले मात्र सुरू केलेली सर्व विकास कामे अर्धवट ठेवली आहेत. येथील बस स्थानकाचे काम २०१७ पासून सुरू आहे. मात्र आजही ते पूर्ण होऊ शकले नाही. तर दुसरीकडे नाईक यांनी आपल्या मतदारसंघातील कुडाळ, ओरोस आणि मालवण येथील बस स्थानकाची कामे जलद गतीने मार्गी लावल्याचे राऊळ म्हणाले.स्व:ता कसला विकास केला नाही, आणि दुसऱ्यालाही करू दिला नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी येथील मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी चार बैठका बोलावल्या होत्या. मात्र केसरकरांच्या श्रेय घेण्याच्या बालिश हट्टामुळे या बैठका झाल्या नाहीत. खासदार विनायक राऊत सुद्धा जन हिताचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात कोणी ढवळाढवळ करू नये, असे सांगून खो घातला. स्वतः काही करायचे नाही, आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही, ही केसरकर यांची नियत राहिली आहे. आणि त्याचा फटका सर्व सामान्य माणसाला बसत असल्याचे राऊळ म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर