शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सिंधुदुर्गातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम, राजन तेलींचे प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 28, 2023 16:50 IST

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील ...

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत. आडाळीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगले उद्योग येत आहेत. राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरु आहेत असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात नाहक वातावरण बिघडू नये सल्ला माजी आमदार राजन तेली यांनी दिला आहे. चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तेली म्हणाले, भाजप कडून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे मात्र शहरांतल्या अर्चना घारेनी आदी गावं आणि गावाचे प्रश्न समजून घ्यावेत. लोकांच्या ओळखी वाढवाव्यात. नंतर टीका करावी तब्बल ६३ वर्षे राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आहे तर पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी नेमके काय केले..? याचे उत्तर द्यावे.महाविकास आघाडीची सत्ता असताना दोडामार्ग तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न अर्चना घारेनी किती वेळा मांडला? आडाळी एमआयडीसीचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला नाही. आता निवडणुक लढवायची आहे म्हणून जनतेला गाजर दाखवायचे उद्योग करु नका. कारण महाविकास आघाडीने आडाळी एमआयडीसीला कधीच महत्व दिल नाही. उद्योग आणण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, याची जाणीव स्थानिकांना आहे. आघाडी शासनात राष्ट्रवादीच्याच आदिती तटकरे या उद्योग खात्याच्या राज्यमंत्री होत्या, हे अर्चना घारे यांना माहिती नव्हतं कां? त्यावेळी स्वतःच्या पक्षाकडे उद्योगमंत्रीपद असताना आडाळी एमआयडीसी त्यांना दिसली नाही. आणि आता भाजपने एमआयडीसीचा मुद्दा लावून धरल्यावर त्यांना रोजगाराचा प्रश्न दिसू लागला.भाजपवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेच्या हस्ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किट वाटप केले, हा विरोधाभास कशाला मग? केंद्रातील योजनाचा लाभ मिळवून देताना भाजपवर टीका करतात, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो, याचं भान अर्चना घारेनी ठेवाव. अजित पवार बाहेर पडल्यानेच पवार कुटूंबाला उर्वरित राज्य दिसू लागले. अन्यथा बारामती च्या विकासापलीकडे त्यांनी कधी विचार देखील केला नाही.अशी टीका तेली यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस