शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सिंधुदुर्गातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम, राजन तेलींचे प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 28, 2023 16:50 IST

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील ...

सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत. आडाळीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगले उद्योग येत आहेत. राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरु आहेत असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात नाहक वातावरण बिघडू नये सल्ला माजी आमदार राजन तेली यांनी दिला आहे. चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तेली म्हणाले, भाजप कडून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे मात्र शहरांतल्या अर्चना घारेनी आदी गावं आणि गावाचे प्रश्न समजून घ्यावेत. लोकांच्या ओळखी वाढवाव्यात. नंतर टीका करावी तब्बल ६३ वर्षे राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आहे तर पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी नेमके काय केले..? याचे उत्तर द्यावे.महाविकास आघाडीची सत्ता असताना दोडामार्ग तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न अर्चना घारेनी किती वेळा मांडला? आडाळी एमआयडीसीचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला नाही. आता निवडणुक लढवायची आहे म्हणून जनतेला गाजर दाखवायचे उद्योग करु नका. कारण महाविकास आघाडीने आडाळी एमआयडीसीला कधीच महत्व दिल नाही. उद्योग आणण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, याची जाणीव स्थानिकांना आहे. आघाडी शासनात राष्ट्रवादीच्याच आदिती तटकरे या उद्योग खात्याच्या राज्यमंत्री होत्या, हे अर्चना घारे यांना माहिती नव्हतं कां? त्यावेळी स्वतःच्या पक्षाकडे उद्योगमंत्रीपद असताना आडाळी एमआयडीसी त्यांना दिसली नाही. आणि आता भाजपने एमआयडीसीचा मुद्दा लावून धरल्यावर त्यांना रोजगाराचा प्रश्न दिसू लागला.भाजपवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेच्या हस्ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किट वाटप केले, हा विरोधाभास कशाला मग? केंद्रातील योजनाचा लाभ मिळवून देताना भाजपवर टीका करतात, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो, याचं भान अर्चना घारेनी ठेवाव. अजित पवार बाहेर पडल्यानेच पवार कुटूंबाला उर्वरित राज्य दिसू लागले. अन्यथा बारामती च्या विकासापलीकडे त्यांनी कधी विचार देखील केला नाही.अशी टीका तेली यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस