शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत वीज वाहिन्यांबाबत नाईकांनी काय केले ?: बंडू हर्णे यांचा प्रतिप्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:44 IST

कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते. या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले नाही ? असा प्रतिप्रश्न नगरसेवक बंडू हर्णे यांनी विचारला आहे.

ठळक मुद्देभूमिगत वीज वाहिन्यांबाबत नाईकांनी काय केले ?: बंडू हर्णे यांचा प्रतिप्रश्नरेल्वे स्टेशन उद्यान कधी उभारणार

कणकवली : कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते. या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले नाही ? असा प्रतिप्रश्न नगरसेवक बंडू हर्णे यांनी विचारला आहे.तसेच ही योजना राबविताना रस्त्याची खोदाई करून भुमीगत वीज वाहिनी टाकण्यात येणार होती. भविष्यात शहरातील रस्ता रुंदीकरण करताना त्याची अडचण होईल. त्यामुळे या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी त्यावेळी होणारा खर्च महावितरणने करावा व तसे हमीपत्र आता द्यावे, अशी मागणी केल्यानंतर महावितरणने ते दिले नाही.

त्यामुळे नाहरकत देण्यात आलेली नाही. मात्र , त्या निधीतून सुशांत नाईक यांनी महाडीक कंपाऊंड जवळ ट्रान्सफार्मर बसवून स्वत:चा पाच लाखांचा फायदा करून घेतला आहे. असा आरोपही बंडू हर्णे यांनी यावेळी केला.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. विराज भोसले, माजी बांधकाम सभापती अभिजित मुसळे, अजय गांगण, किशोर राणे, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, सुशांत नाईक हे स्वतः खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचे समजतात. मात्र, त्यांनी कणकवली शहरातील रेल्वेस्टेशन जवळील उद्यान व नगरपंचायतला नवीन ट्रॉलीसह ट्रॅक्टर देण्यासाठी ११ आॅगस्ट २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला होता. त्याला तीन वर्षे होऊन गेली . मात्र, त्याबाबत सुशांत नाईक यांनी किती पाठपुरावा केला.

या भूमिगत विजवाहिनीच्या कामासाठी खासदारांनी निधी आणला, असे सांगणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपण सत्तेत असताना पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. हे त्यांचे अपयश आहे.आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्यापही महावितरणने केली नसल्याने हा निधी मागे गेला आहे़. मात्र , या योजनेतून कणकवली शहरात १२ ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.सुशांत नाईक ज्यांच्या संगतीला लागले आहेत त्यांनी शहरामध्ये आतापर्यंत फक्त वाद लावण्याचे काम केले आहे. जे लोक मागच्या दाराने नगरपंचायतमध्ये आले आहेत त्यांच्या सांगण्यावरून सुशांत नाईक चुकीच्या पध्दतीने प्रसिद्धी माध्यमाना माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्या सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता चार वर्षे होती़ .त्या ठिकाणचा भूमिगत वीज वाहिन्यांचा निधी सुद्धा त्या वेळच्या पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्या आपापसातील वादामुळे परत गेला आहे.

यापूर्वी त्या दोघांमध्ये वाद असल्याचे आम्ही फक्त ऐकून होतो. मात्र, आमच्यावर टिका करून नाईक यांनी ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे आमच्यावर व आमदार नितेश राणेंवर टीका करण्यापूर्वी नाईक यांनी आधी त्याचा विचार करावा. निधी आला पण सुशांत नाईक यांना त्यांच्या सत्ता काळात पाठपुरावा करता आला नसल्याने तो निधी खर्च होऊ शकलेला नाही.मालवण येथे भूमिगत विजवाहिन्यांचे काम सुरू असून तिथे स्क्वेअर रनिंग मिटरचा दर १४३५ रूपये असताना तो ९२५ रुपये असल्याचे सांगून खोटी आकडेवारी नाईकांनी दिली आहे. या कामासाठी आमचा दर २३०० रूपये व सावंतवाडीचा २५०० रूपये होता. याची माहिती नाईक यांनी आधी घ्यावी आणि नंतरच वक्तव्य करावे.या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा . आम्हाला तो मान्य असेल. असे आम्ही सांगूनही महावितरणने त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे हा निधी मागे गेला आहे. तरीही भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पुन्हा निधी मिळावा यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास बंडू हर्णे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग