शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नीतेश राणे यांचा सवाल : व्हिडिओ कॉन्फरन्सचा सिंधुदुर्गला काय फायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 15:16 IST

या पत्रात म्हटले आहे की, व्यापारी व सामान्य नागरिक यांना एक न्याय, सत्ताधारी लोकप्रतिनिधी व नेते यांना वेगळा न्याय ही कार्यपद्धती विकसनशील आणि संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्ह्याला घातक आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र, प्रशासनाच्या चुकांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कणकवली : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ह्यटेंपरेचर गनह्ण मागविलेल्या आहेत. असे सातत्याने सांगितले जाते. मग नेमक्या किती टेंपरेचर गन आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहेत? कोविड - १९ च्या टेस्टिंग किट्स नसल्याने दिवसाला १० ते १५ पेक्षा जास्त तपासण्या होत नाहीत. आरोग्य यंत्रणेचा अडीच महिन्याचा पगार झालेला नाही.

या यंत्रणेने जर काम बंद केले तर त्याला जबाबदार कोण ? प्रशासन म्हणून आपण जी व्हिडिओ कॉन्फरन्स करता त्याचा सिंधुदुर्गला काय फायदा होतो. याची आधी उत्तरे जनतेला द्या, असे आवाहन एका पत्राद्वारे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकाºयांना केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, व्यापारी व सामान्य नागरिक यांना एक न्याय, सत्ताधारी लोकप्रतिनिधी व नेते यांना वेगळा न्याय ही कार्यपद्धती विकसनशील आणि संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्ह्याला घातक आहे.

कोरोनाच्या लढाईमध्ये मी व माझा पक्ष पहिल्या दिवसापासून प्रशासनाला पाहिजे ती मदत आणि सहकार्य करीत आलेलो आहोत. पण प्रशासनाच्या माध्यमातून होणाºया चुका व संभ्रमाचे वातावरण यामुळे व्यापाºयांना त्रास होत आहे.

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपण आम्हांला ह्यटेंपरेचर गनह्ण नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत मागवलेल्या आहेत. असे सातत्याने सांगत आलेले आहात. मग नेमक्या किती ह्यटेंपरेचर गनह्ण आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहेत? याची माहिती आम्हांला द्यावी. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या म्हणण्याप्रमाणे वारंवार राज्य सरकारकडे कोविड-१९च्या टेस्टिंग किट्स मागितल्या आहेत. मात्र, आजच्या तारखेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १० ते १५ च चाचण्या होत आहेत. मग नेमके प्रशासन म्हणून आपण जे व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठका घेता त्याचा सिंधुदुर्गला काय फायदा होतो? हा प्रश्न आम्हांला पडला आहे.

शासकीय आरोग्य यंत्रणेचा (डॉक्टर्स, नर्स व अन्य) मार्च महिन्याचा ५० टक्के पगार तसेच एप्रिल महिन्याचा पगार झालेला नाही. त्यातच भर म्हणून मे महिन्याच्या पगाराबद्दल आजपर्यंत काहीच चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये पगार नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेने काम बंद केले तर त्याला जबाबदार कोण? याचेही उत्तर आपण आम्हांला द्यावे.जिल्ह्यातील व्यापाºयांबरोबर प्रशासनाचा खेळ सुरू आहे. त्याच्यामुळे व्यापारी हे मानसिक दृष्टीकोनातून खचत चालले आहेत. काही तासांमध्ये प्रशासनाचे निर्णय बदलत असून जिल्हाधिकारी म्हणून आम्हांला अजून संभ्रमात टाकण्याचे काम सातत्याने आपण करीत आहात.

जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस खाते यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही. याचा अनुभव आम्हांला सातत्याने आलेला आहे. क्वारंटाईन लोकांची होणारी गैरसोय, त्या ठिकाणची दुरवस्था, मिळणारे जेवण आणि रोज टेंपरेचर न तपासणे अशा पद्धतीच्या चुका होत असताना जिल्हावासीयांनी कोरोनाच्या विरुद्ध कसे लढायचे ? याचे उत्तर आपण आम्हांला द्यावे, असेही या पत्रात म्हटले आहे. 

व्यापारी व सामान्य नागरिक यांना एक न्याय तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी व नेते यांना वेगळा न्याय हे आपल्या उपस्थितीत होत असताना आम्ही वारंवार बघत आलेलो आहोत. म्हणून आपण कोरोनाशी लढत असताना अशा पद्धतीच्या चुका होत असतील तर लोकांवर अन्याय होत असताना आम्हांला त्यांचे प्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे गरजेचे आहे. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा विकसनशील आणि संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आम्ही नमूद केलेल्या चुका प्रशासनाने लवकरात लवकर सुधाराव्यात.- नीतेश राणे, आमदार, कणकवली मतदार संघ

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी