शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेसाठी फणस आणायला गेले अन् अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले; वर्षभरातील दुसरी घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:31 IST

फणसवाडी येथील घटनेने ग्रामस्थ दहशतीखाली 

वैभव साळकरदोडामार्ग : मांगेलीच्या वर्षा पर्यटनाचा यंदाचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच फणसवाडी धबधबा परिसरात वटपौर्णिमेसाठी फणस आणण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. विष्णू लाडू गवस (वय ५०) असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर बांबुळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, मांगेली गाव सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत वसला आहे. त्यामुळे जंगली श्वापदांचा इथे कायमच वावर असतो. मात्र, गेल्या वर्षभरापूर्वी तळेवाडी येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही जंगली प्राण्याने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला नव्हता. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा एकदा अस्वलाने हल्ला करून स्थानिक नागरिकाला जखमी करण्याची घटना मंगळवारी घडली. विष्णू गवस हे फणसवाडी येथील धबधब्याच्या परिसरात वटपौर्णिमेसाठी फणस आणण्याकरिता गेले होते. यावेळी त्या फणसाच्या झाडाखाली असलेले अस्वल व त्याची पिल्ले त्यांना दिसली नाहीत.अस्वलाला आपल्या बाजूने येत असलेले गवस दिसताच त्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात अस्वलाने त्यांच्या मांडीला व गुप्तांगाला नखांनी ओरबाडल्याने गंभीर दुखापत झाली. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गवस यांनी आरडाओरडा केला असता अस्वलाने तेथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र तोपर्यंत गवस रक्तबंबाळ झाले होते. त्याच अवस्थेत त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्थानिकांनी उपचारासाठी आणले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले आहे.

वर्षभरातील दुसरी घटनागेल्या वर्षभरात अस्वलांचा मांगेली परिसरात वावर वाढला आहे. साधारणतः वर्षभरापूर्वी तळेवाडी येथील सुरेश गवस यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना जायबंदी केले होते. त्यानंतर दुसरा हल्ला मंगळवारी फणसवाडी येथील विष्णू गवस यांच्यावर झाला. त्यामुळे मांगेलीत खळबळ उडाली आहे

मांगेली दहशतीखाली ?गेल्या वर्षभरात मांगेलीतील तळेवाडी व तिला लागून असलेल्या फणसवाडी येथील नागरिकावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वर्षभराच्या फरकाने घडल्या. मंगळवारी झालेला हल्ला तर भर वस्तीशेजारी आणि तळेवाडीत जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून काही अंतरावर झाला. त्यामुळे अस्वलाची कमालीची दहशत लोकांमध्ये पसरली आहे. तळेवाडीत जाणारी शाळकरी मुले याच मार्गाने जातात. शिवाय पर्यटन हंगामही आता तोंडावर आहे. त्यामुळे या हल्लेखोर अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यूforest departmentवनविभाग