शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू : अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:30 IST

AmboliHillStation, Land, AbdulSattar, Minister, sindhudurgnews जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.

ठळक मुद्देकबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू : अब्दुल सत्तार आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीची बैठक

आंबोली : जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले कबुलायतदार जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यासाठी शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी रविवारी येथे दिले.आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी सहायक वनसंरक्षक आय. डी. जळगांवकर, दिगंबर जाधव, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गेली अनेक वर्षे जमीन हक्कासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा अविरत लढा सुरूच असून हा लढा आता सत्यात उतरणार आहे. कबुलायतदारांचा हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या पिढीला ही बाब सुखकारक असणार आहे. त्यांचा हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.कबुलायतदार यांना जमिनीचे वाटप करताना कोणावरही अन्याय न होता समान पद्धतीने त्यांना न्याय दिला जाईल. शासन आपल्या दरबारी येऊन आपल्या सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापुढेही कबुलयातदारांचे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.जंगली प्राण्यांपासून उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजनाकबुलायतदार यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री व उच्चस्तरीय अधिकारी यांची मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच या भागात जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होेते. यासाठी सध्या जे जमीन कसत आहेत त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही व्हावी व वनविभागाने जंगली प्राण्यांपासून होणारे उपद्रव टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे यावेळी सत्तार म्हणाले.अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार : केसरकरआमदार केसरकर म्हणाले, गेली कित्येक वर्षे चौकुळ, गेळे, आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न प्रलंबित होता. आम्ही सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. आता हा प्रश्न अंतिम टप्यात आला आहे. कबुलायतदार प्रश्न सोडविण्यासाठी उच्च स्तरावर सर्व प्रकारची कार्यवाही पूर्ण होत आली आहे. त्यामुळे कबुलायतदार हे जमिनीचे हक्कदार होणार आहेत.प्रश्न सुटल्यावर विविध योजनांचे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या त्यांच्या भरपाई बाबतचे लाभ त्यांना मिळण्यास ते पात्र होतील. तसेच इतर अनेक शासकीय योजनांचे लाभ संबंधिताना घेता येणार आहेत. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारministerमंत्रीAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग