शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:13 IST

ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि मगच आमच्यावर टीका करावी. विरोधक सक्षमपणे आपली भूमिका बजावत नसल्याने आम्ही सत्ताधारी असलो तरी जनहितासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. असा टोला भाजप नेते संदेश पारकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला विरोधक सक्षम नसल्यानेच आमचे आंदोलन

कणकवली : ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि मगच आमच्यावर टीका करावी. विरोधक सक्षमपणे आपली भूमिका बजावत नसल्याने आम्ही सत्ताधारी असलो तरी जनहितासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. असा टोला भाजप नेते संदेश पारकर यांनी लगावला आहे.महामार्ग चौपदरीकरण कामाविषयी निर्माण झालेल्या समस्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी करीत शिवसेना - भाजप युतीने कणकवलीत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावरून मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर व काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर यांनी टीका केली होती. त्या टीकेला संदेश पारकर यांनी मंगळवारी येथील भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावन्त- पटेल , नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावन्त, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाविषयी आम्ही जनआंदोलन केल्यावर त्या कामाला गती आली आहे. मात्र, या जनआंदोलनानंतर काही विरोधी राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमाद्वारे टीका केली आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेपासून आम्ही जनहितासाठी आंदोलने करीत आहोत. त्यामुळे आम्हाला आता जाग येण्याचा प्रश्नच नाही. तसेच काही नेत्यांना महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने चारचाकी गाड्या भेट दिल्या असून त्यांची वैधता संपल्याने पुन्हा त्यानी आंदोलने सुरू केली आहेत.अशी टीका मनसेचे नेते परशुराम उपरकर व काँग्रेसचे प्रवक्ते काका कुडाळकर यांनी केली होती.मात्र, जनतेच्या समोर सत्य यावे म्हणून मी सांगू इच्छितो की, महामार्गाच्या कोट्यावधी रुपयांच्या कामासाठी आम्ही किरकोळ चारचाकी गाडी घेऊन ठेकेदाराला मनमानी करायला देऊ असे म्हणणे हे मूर्खपणाचे आहे. बँकेचे कर्ज काढूनच मी चारचाकी गाडी घेतली आहे. त्या कर्जाचा दरमहा हप्ता बँकेत भरला जात आहे. अजून १६ लाख रुपये कर्ज शिल्लक आहे. त्याची पडताळणी संबधित बँकेत जाऊन कोणीही करू शकतो.आम्ही राजकारण पारदर्शकपणे करीत असतो. गाड्यांबाबत जर कोणाला माहिती हवी असेल तर संबधित ठेकेदाराला त्यांनी विचारावे. या कामात काही देवघेव झाली असेल, भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात यावी. महामार्ग ठेकेदाराने कोणाचे वैयक्तिक रस्ते केले . कोणाला डँपर द्वारे माती पुरविली. याचीही चौकशी व्हावी . म्हणजे नेमके सत्य बाहेर येईल.महामार्ग चौपदरीकरण कामाबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी ३१ मे पर्यंत 'डेडलाईन' आम्ही दिली आहे. तोपर्यँत समस्या न सुटल्यास जनआंदोलन करण्यात येईल.झाराप ते खारेपाटण या परिसरातही महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी करावी. तसेच संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी. असेही संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.हिंमत असेल तर तुम्ही आंदोलन करा!आमच्यावर टीका करणारे विरोधक जनहितासाठी काही करीत नाहीत . त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. विकास कामे आमचे सरकार करीत असून स्थानिक पातळीवर त्या विकास कामे करणाऱ्यांवर दर्जेदार काम व्हावे यासाठी अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत. विरोधकामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करावे .असा टोला संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.जनता भरडली जाऊ नये ही भूमिका !जिल्ह्याचा विकास होत असताना सर्वसामान्य जनता भरडली जाऊ नये.अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. परशुराम उपरकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आम्ही केलेल्या जनहीतासाठीच्या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे होते. मात्र , तसे झाले नाही. काका कुडाळकर यांनी नुसती टीका करण्यापेक्षा ते जर लोकसभा प्रचारासाठी जिल्ह्यात सक्रियपणे फिरले असते तर काँग्रेसच्या मतात वाढ झाली असती.त्याचबरोबर जनमतही त्यांना समजले असते. या दोघांनी जनतेच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे . असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग