शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

आम्ही निष्ठेला जागणारे, पळपुटे आमदार नव्हे - वैभव नाईक 

By सुधीर राणे | Updated: October 7, 2023 13:27 IST

भाजपच्या आमदारांनी २२०० कोटीचा निधी आणल्याचा फलक लावला, तो नेमका कोठे गेला?

कणकवली: भाजपच्या स्थानिक आमदारांनी २२०० कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याचा फलक कणकवली  शहरात लावला आहे. तो निधी नेमका कोठे गेला. हे त्यांनी जनतेला सांगावे. असे सांगतानाच कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्ही निष्ठेला जागणारे आहोत, पळपुटे आमदार नाही,असे प्रतिपादन  ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.कणकवली येथे 'होऊ द्या..चर्चा अंतर्गत आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हासंघटक जान्हवी सावंत यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, जनतेच्या मनातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी शिवसेनेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेवू, मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण देवू असे सांगितले होते. त्याचे काय झाले? ..तर आरोग्य व्यवस्था सुधारली असतीसरकारी नोकर भरतीमध्येही खासगीकरण आणण्यासाठी सरकारने ९ कंपन्या नेमल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये भाजपच्या आमदारांच्या जास्त कंपन्या आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून १ कोटी रुपये मंडप घालण्यासाठी देण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी ९० लाख एसटी भाडे लागले. लोकांच्या आरोग्यासाठी हे २ कोटी वापरले असते तर आरोग्य व्यवस्था सुधारली असती. 'हे' उद्धव ठाकरे यांनी केलेले काम ओरोस जिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषधे नाहीत. कोरोना काळात याच जिल्हा रुग्णालयात असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने १२ हजार लोक बरे होवून गेले आहेत. त्यावेळी असलेली आरोग्य यंत्रणा चांगल्याप्रकारे हाताळली होती. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आहे.आता जनतेने विचार करावातलाठी परीक्षा भरती प्रक्रियेला पेपर फुटला ? त्यावेळीही मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली. जिल्ह्यातील ४३४ शाळा बंद होणार आहेत. आम्ही आंदोलन केले, मंत्री सांगताहेत शिक्षक भरती करतो. मात्र, अद्याप शिक्षकांची भरती झालेली नाही. स्थानिक आमदार 'हिंदू खतरे मे है' असे सांगत फिरतात. मात्र सत्तेत हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. याचा विचार आता जनतेने करावा. गुरुनाथ खोत म्हणाले, देशातील सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले आहे. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने लोकांना देशोधडीला लावले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सरकार बदलावेच लागेल. संदेश पारकर म्हणाले, भाजपच्या विरोधात जनतेच्या मनात चीड आहे. भाजपाने विविध घोषणा केल्या मात्र, पूर्ण केल्या नाही. तरुणांना रोजगार नाही. शिवस्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण नाही. महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे. जिल्ह्यात ३० वर्षे राणेंची सत्ता आहे.त्यांनी जनतेसाठी काय केले? हे विचारावे लागेल. त्यामुळे या विधानसभा मतदासंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागूया. यावेळी उपस्थित इतर मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक BJPभाजपाShiv Senaशिवसेना