शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:51 IST

Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देवीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा सहा माजी नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट

सावंतवाडी : गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, संजय पेडणेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू उपस्थित होते, तर निवेदनावर माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर व शुभ्रा सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.सावंतवाडी शहरामध्ये जानेवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावत आहे.

पाणीपुरवठा योजनेमध्ये मुबलक पाणी असून, पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीटंचाई जाणवत असल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तर भोगटे यांनी चितारआळी, भटवाडी, वैश्य वाडा, उभाबाजार, सालईवाडा या भागात पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली.

विलास जाधव यांनी मोर डोंगरी, गणेश नगर, सर्वोदय नगर, गरड तर उमाकांत वारंग यांनी खासकीलवाडा भागात पाणीपुरवठा योजना फुटली असल्याकडे लक्ष वेधले. अफरोज राजगुरू यांनी बुराण गल्ली, जुम्मा मशिदपर्यंत, तर कीर्ती बोंद्रे, विलास जाधव यांनी पाणीटंचाईबाबत लक्ष वेधले. सावंतवाडी शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा असला तरी तो पुरेसा असावा याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले. यापूर्वी अशी पाणीटंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीदेखील एकवेळ पाणीपुरवठा होत होतायावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वेळापत्रक बदलले गेले. मात्र, आजच्या परिस्थितीत शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. यावेळी पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनीदेखील शहरामध्ये जेथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, तेथे आम्ही जाऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वीदेखील एक वेळ पाणीपुरवठा होत होता याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीwater shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग