शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:51 IST

Sawatnwadi watershorteg Sindhudurg- गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देवीस वर्षांत प्रथमच सावंतवाडीत पाणीटंचाई, कारण शोधा सहा माजी नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट

सावंतवाडी : गेल्या वीस वर्षांत सावंतवाडी शहरवासीयांना पाणीटंचाई भासली नव्हती. पण मागील तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीपुरवठा होत नसल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत योजना आखावी, अशी मागणी शहरातील सहा माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी जावडेकर यांनी सध्याच्या परिस्थितीत दिवसा दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, संजय पेडणेकर, कीर्ती बोंद्रे, अफरोज राजगुरू उपस्थित होते, तर निवेदनावर माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर व शुभ्रा सावंत यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.सावंतवाडी शहरामध्ये जानेवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावत आहे.

पाणीपुरवठा योजनेमध्ये मुबलक पाणी असून, पाण्याच्या वेळा बदलूनही पाणीटंचाई जाणवत असल्याने मुख्याधिकारी यांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तर भोगटे यांनी चितारआळी, भटवाडी, वैश्य वाडा, उभाबाजार, सालईवाडा या भागात पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली.

विलास जाधव यांनी मोर डोंगरी, गणेश नगर, सर्वोदय नगर, गरड तर उमाकांत वारंग यांनी खासकीलवाडा भागात पाणीपुरवठा योजना फुटली असल्याकडे लक्ष वेधले. अफरोज राजगुरू यांनी बुराण गल्ली, जुम्मा मशिदपर्यंत, तर कीर्ती बोंद्रे, विलास जाधव यांनी पाणीटंचाईबाबत लक्ष वेधले. सावंतवाडी शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा असला तरी तो पुरेसा असावा याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले. यापूर्वी अशी पाणीटंचाई जाणवली नसल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीदेखील एकवेळ पाणीपुरवठा होत होतायावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वेळापत्रक बदलले गेले. मात्र, आजच्या परिस्थितीत शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. यावेळी पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनीदेखील शहरामध्ये जेथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, तेथे आम्ही जाऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वीदेखील एक वेळ पाणीपुरवठा होत होता याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीwater shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग