शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

वेंगुर्ला आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:28 IST

वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देवेंगुर्ला पाणीटंचाई आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम भूवैज्ञानिकांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.वेंगुर्ला तालुक्याची संभाव्य पाणीटंचाई आराखडा आढावा सभा येथील साई मंगल कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी श्रीपाद पाताडे, पंंचायत समिती सदस्य यशवंत परब यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.प्रथम पाताडे यांनी गतवर्षीचा पाणीटंचाई आराखडा व झालेली कामे याबाबत माहिती दिली. गतवर्षी मंजूर केलेल्या नळयोजना विशेष दुरुस्तीतील ९ कामांपैकी ४ कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. तात्पुरती पूरक नळयोजनांमधील २ कामांपैकी १ काम प्रगतीपथावर तर एका कामास कार्यारंभ आदेश प्राप्त नाहीत.विंधन विहिरीच्या एकूण ५ कामांपैकी १ काम पूर्ण आहे. २ कामे बक्षिसपत्र झाली नाहीत तर २ कामे झालेली नाहीत. विहीर खोल करणे व गाळ काढणे या ९ कामांपैकी फक्त ३ कामे झाली असून ६ कामे झालेली नाहीत. एकूण ३८ कामांपैकी १७ पूर्ण व ५ कामे मार्चपूर्वी करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी गतवर्षी मंजूर झालेल्या कामांना जो निधी मंजूर झाला होता, तो निधी १ वर्षांनंतर काम सुरू केल्यास वाढणार असून त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. ज्या वर्षीची कामे त्याच वर्षी होण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सुचविले.कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत यांनी विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र, या सभेला का उपस्थित राहत नाहीत? असा प्र्रश्न केला. यावर केसरकर यांनी पुढच्यावेळी त्यांना बोलविण्यात येईल, असे सांगितले. आजची ही टंचाईची आढावा बैठक घेत असताना निधीची तरतूद आहे का, ते प्रथम सांगावे. परबवाडा ग्रामपंचायतीतील एक काम मंजूर केले.मात्र, त्याला निधी आला नव्हता. ग्रामपंचायतीने ते ठेकेदारामार्फत करून घेतले. त्यावेळी ठेकेदाराला पैशासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार खेपा माराव्या लागल्या. याकडे परबवाडा सरपंच पपू परब यांनी लक्ष वेधले. यावर पाताडे यांनी यावर्षी भरीव निधी असल्याचे सांगितले. त्यानंतर खानोली, होडावडा, आडेली, वेतोरे, कुशेवाडा, रेडी या भागातीलही सरपंचांनी टंचाईच्या समस्या मांडल्या.दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी वेंगुर्ला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ज्या अडचणी असतील त्या जिल्हा परिषदेपर्यंत आणाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. सभेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार सभापती अनुश्री कांबळी यांनी मानले.बक्षिसपत्र जमिनींबाबत तोडगा काढणारआमदार केसरकर म्हणाले, तिलारीची नळपाणी योजना वर्षअखेरपर्यंत वेंगुर्ल्यापर्यंत येणार आहे. त्याचा फायदा वेंगुर्ल्याला होईल. तसेच टंचाईतील कामांसाठी सार्वजनिक विहिरीला दोन गुंठे जागा लागते. मात्र,येथील शेतकऱ्यांची जमीन आधीच कमी असते. त्यामध्ये दोन गुंठे बक्षिसपत्राने दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत येणाऱ्या अडचणी आणि खनिकर्म भागातील जमिनीबाबत आपण ग्रामविकास मंत्री, महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे सांगितले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग