शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान, रणसंग्रामास प्रारंभ, दिग्गजांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 21:57 IST

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे.

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे. ६ एप्रिल रोजी निवडणूक मतदान होणार असून, यावेळी नगरपंचायतीचा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक थेट जनतेतून निवडून देण्यात येणार आहेत. आचारसंहिता सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून जाहीर झाली असून ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे.कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर २००३ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. मात्र त्यानंतर सन २००८ व २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुमताच्या आधारावर नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली होती. आता २०१८ मध्ये होणा-या या निवडणुकीत पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रथमच निवडणूक लढवित असून त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच गाव विकास आघाडीही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आता कणकवलीत शहरातील वातावरण तापणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रमकणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता जाहीर झाली. या निवडणुकीचा कार्यक्रम ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी जारी करणार आहेत. १२ मार्चपासून नामनिर्देशन पत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून १९ मार्चपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंच्या कालावधीत ते स्विकारण्यात येणार आहेत. २० मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. २७ मार्च रोजी अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे.  ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात लक्षवेधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील नगरपंचायत निवडणुकीला फार महत्व आहे. ही नगरपंचायत आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि  भाजपा नेते संदेश पारकर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणा-या या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पूर्ण ताकदिनीशी उडी घेतल्याने यावेळची निवडणूक अतिशय रंजक आणि लक्षवेधी असणार आहे.