शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कणकवली नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान, रणसंग्रामास प्रारंभ, दिग्गजांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 21:57 IST

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे.

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहिता जाहीर केली आहे. या नगरपंचायतीची १६ एप्रिल रोजी मुदत संपत आहे. ६ एप्रिल रोजी निवडणूक मतदान होणार असून, यावेळी नगरपंचायतीचा नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक थेट जनतेतून निवडून देण्यात येणार आहेत. आचारसंहिता सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून जाहीर झाली असून ७ एप्रिल पर्यंत असणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे.कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर २००३ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. मात्र त्यानंतर सन २००८ व २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुमताच्या आधारावर नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड झाली होती. आता २०१८ मध्ये होणा-या या निवडणुकीत पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रथमच निवडणूक लढवित असून त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. तर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तसेच गाव विकास आघाडीही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे आता कणकवलीत शहरातील वातावरण तापणार आहे. असा असेल निवडणूक कार्यक्रमकणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी आचारसंहिता जाहीर झाली. या निवडणुकीचा कार्यक्रम ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी जारी करणार आहेत. १२ मार्चपासून नामनिर्देशन पत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करता येणार असून १९ मार्चपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंच्या कालावधीत ते स्विकारण्यात येणार आहेत. २० मार्च रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. २७ मार्च रोजी अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे.  ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात लक्षवेधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील नगरपंचायत निवडणुकीला फार महत्व आहे. ही नगरपंचायत आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि  भाजपा नेते संदेश पारकर यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणा-या या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही पूर्ण ताकदिनीशी उडी घेतल्याने यावेळची निवडणूक अतिशय रंजक आणि लक्षवेधी असणार आहे.