शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

सावर्डे परिसरातील गावे १८ दिवस अंधारात

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

दिव्याखाली अंधार : महावितरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे परिसरातील गावे २४ सप्टेंबरपासून आजतागायत म्हणजेच १८ दिवस अंधारात आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी परस्परांकडे बोट दाखवत असून, कंपनीच्या या अनागोंदी कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. शनिवार (दि.११) पासून तात्पुरत्या स्वरुपात शेजारच्या गावातून वीज पुरवण्यात आली आहे. मात्र ती सुद्धा वारंवार खंडीत होत असल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘ट्रायल चालू आहे’, ‘काम चालू आहे’ अशी थातूर मातूर उत्तरे दिली जात आहेत.दि. २४ सप्टेंबर रोजी सावर्डे परिसरातील पिलवली तर्फ सावर्डे, वीर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या दिवशी परिसरात तुफानी पाऊस झाला होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीज खंडित झाली असेल, असे समजून ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवस झाले तरी परिसर अंधारातच होता. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले. त्यांनी संबंधित वायरमनकडे संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, वायरमनने ही बाब अधिकाऱ्यांनाच सांगावी, असे सांगून हात वर केले. त्यामुळे वीज गायब असल्याची तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला.कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या गावातील वीजप्रवाह खंडित होता. पौर्णिमेला या गावांमधील वीजप्रवाह सुरू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खंडित झाला. विशेष म्हणजे परिसरात या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नव्हता, असे ग्रामस्थांनी सांगितले.याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे कळवले. कार्यालयाकडे संपर्क साधला असता वादळामुळे वीज गेल्याचे सांगितले जाते. मात्र, अलिकडे वादळच झाले नाही, तेथे इतके दिवस वादळामुळे वीज गायब कशी होऊ शकते? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरातील गायब झालेली वीज सुरू करण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)अनेक समस्या...इतके दिवस वीज गायब असल्याने गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्या गावात पाणी असूनही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. मोबाईल बॅटरी चार्ज नसल्याने रेंज आहे, पण चार्जिंग नाही, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.वादळ आले तरी कुठे?वादळ आल्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे वीज गायब असल्याचे महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी सांगत आहेत. मात्र, या परिसरात वादळ केवळ एकदाच आले होते आणि ती वीज सुरू करण्यास एवढा वेळ लागतो का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.