शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डे परिसरातील गावे १८ दिवस अंधारात

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

दिव्याखाली अंधार : महावितरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे परिसरातील गावे २४ सप्टेंबरपासून आजतागायत म्हणजेच १८ दिवस अंधारात आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी परस्परांकडे बोट दाखवत असून, कंपनीच्या या अनागोंदी कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. शनिवार (दि.११) पासून तात्पुरत्या स्वरुपात शेजारच्या गावातून वीज पुरवण्यात आली आहे. मात्र ती सुद्धा वारंवार खंडीत होत असल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘ट्रायल चालू आहे’, ‘काम चालू आहे’ अशी थातूर मातूर उत्तरे दिली जात आहेत.दि. २४ सप्टेंबर रोजी सावर्डे परिसरातील पिलवली तर्फ सावर्डे, वीर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या दिवशी परिसरात तुफानी पाऊस झाला होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीज खंडित झाली असेल, असे समजून ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवस झाले तरी परिसर अंधारातच होता. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले. त्यांनी संबंधित वायरमनकडे संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, वायरमनने ही बाब अधिकाऱ्यांनाच सांगावी, असे सांगून हात वर केले. त्यामुळे वीज गायब असल्याची तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला.कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या गावातील वीजप्रवाह खंडित होता. पौर्णिमेला या गावांमधील वीजप्रवाह सुरू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खंडित झाला. विशेष म्हणजे परिसरात या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नव्हता, असे ग्रामस्थांनी सांगितले.याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे कळवले. कार्यालयाकडे संपर्क साधला असता वादळामुळे वीज गेल्याचे सांगितले जाते. मात्र, अलिकडे वादळच झाले नाही, तेथे इतके दिवस वादळामुळे वीज गायब कशी होऊ शकते? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरातील गायब झालेली वीज सुरू करण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)अनेक समस्या...इतके दिवस वीज गायब असल्याने गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्या गावात पाणी असूनही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. मोबाईल बॅटरी चार्ज नसल्याने रेंज आहे, पण चार्जिंग नाही, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.वादळ आले तरी कुठे?वादळ आल्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे वीज गायब असल्याचे महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी सांगत आहेत. मात्र, या परिसरात वादळ केवळ एकदाच आले होते आणि ती वीज सुरू करण्यास एवढा वेळ लागतो का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.