शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सावर्डे परिसरातील गावे १८ दिवस अंधारात

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

दिव्याखाली अंधार : महावितरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे परिसरातील गावे २४ सप्टेंबरपासून आजतागायत म्हणजेच १८ दिवस अंधारात आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी परस्परांकडे बोट दाखवत असून, कंपनीच्या या अनागोंदी कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. शनिवार (दि.११) पासून तात्पुरत्या स्वरुपात शेजारच्या गावातून वीज पुरवण्यात आली आहे. मात्र ती सुद्धा वारंवार खंडीत होत असल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘ट्रायल चालू आहे’, ‘काम चालू आहे’ अशी थातूर मातूर उत्तरे दिली जात आहेत.दि. २४ सप्टेंबर रोजी सावर्डे परिसरातील पिलवली तर्फ सावर्डे, वीर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या दिवशी परिसरात तुफानी पाऊस झाला होता. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वीज खंडित झाली असेल, असे समजून ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवस झाले तरी परिसर अंधारातच होता. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले. त्यांनी संबंधित वायरमनकडे संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, वायरमनने ही बाब अधिकाऱ्यांनाच सांगावी, असे सांगून हात वर केले. त्यामुळे वीज गायब असल्याची तक्रार नेमकी कोणाकडे करावी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला.कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या गावातील वीजप्रवाह खंडित होता. पौर्णिमेला या गावांमधील वीजप्रवाह सुरू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो खंडित झाला. विशेष म्हणजे परिसरात या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नव्हता, असे ग्रामस्थांनी सांगितले.याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे कळवले. कार्यालयाकडे संपर्क साधला असता वादळामुळे वीज गेल्याचे सांगितले जाते. मात्र, अलिकडे वादळच झाले नाही, तेथे इतके दिवस वादळामुळे वीज गायब कशी होऊ शकते? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरातील गायब झालेली वीज सुरू करण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)अनेक समस्या...इतके दिवस वीज गायब असल्याने गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्या गावात पाणी असूनही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. मोबाईल बॅटरी चार्ज नसल्याने रेंज आहे, पण चार्जिंग नाही, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.वादळ आले तरी कुठे?वादळ आल्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे वीज गायब असल्याचे महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी सांगत आहेत. मात्र, या परिसरात वादळ केवळ एकदाच आले होते आणि ती वीज सुरू करण्यास एवढा वेळ लागतो का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.