शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

By admin | Updated: March 15, 2015 00:22 IST

उत्पादन घटल्याने रत्नागिरीच्या काजूला सोन्याचा भाव

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी अवकाळी पावसाचा फटका बसला असला, तरी एकूणच हवामानातील बदलांमुळे काजू पिकाची उत्पादकता घटल्याचे दिसून येत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरामध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. सध्या ९० ते १०५ रूपये दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. मात्र, हा दर काजूच्या दर्जानुसारच ठरत आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. गतवर्षी १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीही लांबली त्यामुळे मोहोर प्रक्रियाच उशिरा सुरू झाली. त्यामुळे गतवर्षी ८५ ते ७५ रूपये किलो दराने काजू खरेदी करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १०५ रूपयांपासून काजू बीला दर उपलब्ध झाला. काजूच्या दर्जावर दर ठरत आहे. हायब्रीड काजू १०० ते १०५ रूपये दराने खरेदी करण्यात येत आहे. काजू पिकावर पावसाचा परिणाम जाणवणार नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, काजू बी पिकल्यानंतर पाऊस आल्यास त्याचा परिणाम जाणवू शकतो. हवामानामुळे काजू बीच्या उत्पादनाबरोबर दर्जावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. बी आकाराने लहान दिसून येत आहे. त्यामुळे प्रति किलोला १६५ ते १७० नग इतकी मोठ्या आकाराची बी प्राप्त होते. तर छोट्या आकाराची १८० ते २०० नग बी प्राप्त होते. अवकाळी पावसामुळे सध्या काजू बीमध्ये १३ ते १६ टक्के मॉश्यूरायझर आढळत आहे. त्यामुळे ही बी वजनाला जास्त भरत आहे. एकूण हवामानामुळे ४० टक्के पिकाचे नुकसान झाले असले तरी ६० टक्के पिक हातात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे मोहोरावर बुरशीचा प्रादूर्भाव झाला होता. परंतु, वातावरणात उष्मा भरपूर असल्याने बुरशीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेवटच्या टप्प्यातीलही काजू हातात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजू विक्रेते निवडक दर्जेदार काजू बी खरेदी करतात. त्यामुळे शहरात आणून बी निवडूनच काट्याला लावली जाते. यावर्षी उत्पादनावर परिणाम झाल्याने दर टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.