शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

युवकावर हल्ला वैभववाडी-सोनाळीतील घटना : हल्लेखोरांना अटक; सरपंचावर गुन्हा

By admin | Updated: May 10, 2014 23:58 IST

वैभववाडी : रात्री अपरात्री शेजार्‍यांच्या घरी येणे जाणे असल्याच्या संशयावरून सोनाळी गावठणवाडीतील युवकावर त्याच गावातील दोघा भावांनी

वैभववाडी : रात्री अपरात्री शेजार्‍यांच्या घरी येणे जाणे असल्याच्या संशयावरून सोनाळी गावठणवाडीतील युवकावर त्याच गावातील दोघा भावांनी पोलीस ठाण्यानजीक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर सोनाळी सरपंचासह त्याच्या भावाने हल्लेखोराच्या भावाला अडवून मारहाण करत संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी हल्लेखोरांना अटक केली असून सरपंच व त्याच्या भावाविरूद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. या दोन्ही घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्या. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार सोनाळी गावठणवाडीतील कमलेश केशव शेलार (वय २८) याचे वाडीतील लोकांच्या घरी रात्री अपरात्री जाणेयेणे असते. त्यामुळे त्याच्यावर संशय होता. या संशयावरूनच सचिन सदाशिव कदम व अनिल सदाशिव कदम यांनी कमलेश हा केशकर्तनालयात गेला असताना त्याला बोलावून घेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. सचिन कदमने कमलेशच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली तर अनिलने हाताच्या ठोशाने बेदम मारहाण केली. कदम बंधूंच्या हल्ल्यात कमलेशच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सचिन व अनिल कदम यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर कमलेशचे नातेवाईक असलेले सोनाळी सरपंच प्रकाश मारुती शेलार व त्यांचा भाऊ सहदेव यांनी हल्लेखोरांचा भाऊ विलास सदाशिव कदम याला शेतातून घरी जात असताना रस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण केली. तसेच कदम बंधूंना संपवून टाकेन अशी धमकी देत विलासच्या दुचाकीचे नुकसान केले. त्यामुळे विलासच्या तक्रारीवरून सरपंच त्यांच्या भावाविरूद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)