शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:12 IST

ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.

ठळक मुद्दे  तालुका बौद्ध सेवा संघातर्फे वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुणवंतांचा सत्कारधम्मक्रांती टिकविण्याचे आपल्यापुढे आव्हान : अंकुश कदम

वैभववाडी : ज्या ज्या वेळी धम्मक्रांती झाली- त्या त्या वेळी प्रतिक्रांतीचा सामना करावा लागला. आजही ती सुरु आहे. त्यामुळे धम्मक्रांती पुढे नेणे सोडाच; ती टीकविण्याचे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे; असे मत कॉम्रेड अंकुश कदम यांनी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात केले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाय धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, शुभांगी यादव, सचिव बाळकृष्ण जाधव, बबनराव मौंदेकर, भगवान खांबाळेकर, सुभाष कांबळे, प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे, सुरेश यादव, अनंत कदम, गणपत वेंगसरकर, गंगाराम कांबळे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, ह्यधम्मक्रांती पुढे नेऊन जग बदलायचे असेल तर आपण बुध्दांचे तत्त्वज्ञान समजून घेतले पाहीजे. यासाठी खूप वाचन करायला हवे. वाचन न करता कोणतीही चळवळ पुढे जात नाही. भगवान गौतम बुध्दांनी या देशात पहिली धम्मक्रांती केली. त्यानंतर सम्राट अशोकांनी धम्मचक्र गतिमान केले. डॉ. बाबासाहेबांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पुन्हा या धम्मचक्राला गती दिली. तरुण पिढीने जागृत होणे गरजेचे आहे.बुध्द पूजापाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, यशवंत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक बाळकृष्ण जाधव यांनी तर सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. प्रफुल्ल जाधव यांनी आभार मानले.राज्य घटना संपविण्याचे कारस्थानभारतीय राज्य घटना संपविण्याचे कारस्थान सध्या जोरात सुरु आहे. देशात जातीय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे आपण समजून घेऊन चळवळीला बळ दिले पाहिजे. चळवळ जीवंत ठेवायची असेल; तर तरुण पिढीने स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे कॉम्रेड अंकुश कदम यांनी सांगितले 

 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाsindhudurgसिंधुदुर्ग