शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:31 IST

Politics Sindhudurg- राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.

ठळक मुद्देवैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ, केसरकरांनाही बसला फटकासरकारचा निर्णय : नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटवली

सावंतवाडी : राज्य सरकारने अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असून, याचा फटका सिंधुदुर्गमधील दोन नेत्यांना बसला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा पूर्णपणे हटविण्यात आली असून माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र वाय प्लसवरून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर आमदार वैभव नाईक यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने आश्चर्य व्यकत होत आहे.राज्य सरकारने राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, यात अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांचा समावेश अधिक आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने माजी मंत्र्यांची सुरक्षाही कमी केली आहे.

नव्याने काहींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सुरक्षेत कपात केलेल्यांमध्ये सिंधुदुर्गातील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांंचा समावेश आहे. राणे यांंची सुरक्षा पूर्णपणे हटवल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, मागील सरकारच्या काळात मात्र त्यांची सुरक्षा कमी केली होती. आमदार दीपक केसरकर हे मागील सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे त्याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. आता वाय दर्जावर आणली.आशिष शेलार झाले आक्रमकमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुरक्षा काढल्याने आमदार आशिष शेलार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा कशी काय कमी केली जाऊ शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आगीशी खेळू नका, असा इशाराही महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग