शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वैभव नाईकांना मंत्रिपदाची स्वप्ने

By admin | Updated: June 10, 2016 00:14 IST

नीतेश राणे : नाईकांनी स्वत:च्या भविष्याची चिंता करण्याचा टोला

कणकवली : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना आता मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे ते पालकमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणाच, असे आव्हान द्यायला लागले आहेत. त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवावा, असा प्रतिटोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सिंधुुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ नगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला संपवल्यानंतर त्यांना आता मंत्री पदाची स्वप्ने पडत असल्यामुळे राणे साहेबांच्या नावांचा वापर करून कॉँग्रेस कार्यकर्त्यांना डिवचून आपल्याला मंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळते का? असे प्रयत्न करताना दिसत आहे. जिल्हाप्रमुख, आमदार, नगरसेवक या माध्यमातून मतदार संघातील सर्व कंत्राटे नातेवाईकांकडेच. आता त्यांची मंत्रीपदासाठी पळापळ चालली आहे. परंतू त्यांना आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करण्यामध्ये वेळ घालवावा. आणि लिंबू कापणाऱ्या बुवांकडे जाऊन नाईक प्रा. लि. नफा व विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करावा.स्वत:च्या पालकमंत्र्यांना कसे अडचणीत आणायचे. आणि स्वत: मंत्री बनायचे हेच ध्येय असणारे नाईक पालकमंत्र्यांवर हक्कभंग आणाच असे सांगून स्वत:ची पोळी भाजताना दिसून येत आहेत. अज्ञानी असलेल्या नाईक यांनी विधीमंडळात कोकणावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचे विश्लेषण नीट कुठल्यातरी जाणकारांकडून किंवा त्याच्यासाठी सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या अनुपम कांबळीकडून समजून घेतले असते तर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर किंबहुना कोकणी जनतेची धुळफेक केल्याचा आरोप स्वत:च केला असता. मुख्यमंत्र्यांच्या आकड्यावर कुडाळच्या जनतेने पण विश्वास ठेवला नाही. म्हणून तेथील जनतेने नगरपालिकेची सत्ता कॉँग्रेसच्या हातात दिली.चिपी विमानतळ हे डिसेंबर २०१५ ला सुरू होणार असे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जाहीर केले होते. मग त्याला आता उशीर का? याचे उत्तर आमदार नाईक देऊ शकले नाहीत. त्याहीपेक्षा सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच जिल्ह्याला गोव्यापेक्षा कमी लेखल्याचा राग नाईकांना का आवरला नाही? याचेच आश्चर्य वाटते. स्वत:च्या मतदार संघातील सी-वर्ल्डबद्दल ना विधीमंडळात बोलतात. ना मतदार संघात बोलतात. यामधून नाईक यांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. राणे साहेबांना रत्नागिरीमध्ये हायवे चौपदरीकरणाला बोलविले गेले हे कदाचित आमदार नाईकांना खुपत असेल. त्या जाहीर कार्यक्रमातही राणे साहेबांचे भाषण ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर तेथेही राणे साहेबांची ताठ आणि परखड भूमिका घेतली, कोकणी माणसाच्या हिताची होती. तीच बोलून दाखविली. चौपदरीकरणाचा मोबदला जास्तीत जास्त मिळावा ही खरी तर आमदार नाईकांची पण भूमिका असली पाहीजे होती. पण राजकारणापलीकडे त्यांचा काहीच स्वार्थ नाही हेच त्यांनी दाखवून दिले. (वार्ताहर)