शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

वैभव नाईकांना मंत्रिपदाची स्वप्ने

By admin | Updated: June 10, 2016 00:14 IST

नीतेश राणे : नाईकांनी स्वत:च्या भविष्याची चिंता करण्याचा टोला

कणकवली : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांना आता मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे ते पालकमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणाच, असे आव्हान द्यायला लागले आहेत. त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवावा, असा प्रतिटोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर आमदार नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सिंधुुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ नगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाला संपवल्यानंतर त्यांना आता मंत्री पदाची स्वप्ने पडत असल्यामुळे राणे साहेबांच्या नावांचा वापर करून कॉँग्रेस कार्यकर्त्यांना डिवचून आपल्याला मंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळते का? असे प्रयत्न करताना दिसत आहे. जिल्हाप्रमुख, आमदार, नगरसेवक या माध्यमातून मतदार संघातील सर्व कंत्राटे नातेवाईकांकडेच. आता त्यांची मंत्रीपदासाठी पळापळ चालली आहे. परंतू त्यांना आमची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करण्यामध्ये वेळ घालवावा. आणि लिंबू कापणाऱ्या बुवांकडे जाऊन नाईक प्रा. लि. नफा व विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करावा.स्वत:च्या पालकमंत्र्यांना कसे अडचणीत आणायचे. आणि स्वत: मंत्री बनायचे हेच ध्येय असणारे नाईक पालकमंत्र्यांवर हक्कभंग आणाच असे सांगून स्वत:ची पोळी भाजताना दिसून येत आहेत. अज्ञानी असलेल्या नाईक यांनी विधीमंडळात कोकणावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचे विश्लेषण नीट कुठल्यातरी जाणकारांकडून किंवा त्याच्यासाठी सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या अनुपम कांबळीकडून समजून घेतले असते तर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर किंबहुना कोकणी जनतेची धुळफेक केल्याचा आरोप स्वत:च केला असता. मुख्यमंत्र्यांच्या आकड्यावर कुडाळच्या जनतेने पण विश्वास ठेवला नाही. म्हणून तेथील जनतेने नगरपालिकेची सत्ता कॉँग्रेसच्या हातात दिली.चिपी विमानतळ हे डिसेंबर २०१५ ला सुरू होणार असे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जाहीर केले होते. मग त्याला आता उशीर का? याचे उत्तर आमदार नाईक देऊ शकले नाहीत. त्याहीपेक्षा सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच जिल्ह्याला गोव्यापेक्षा कमी लेखल्याचा राग नाईकांना का आवरला नाही? याचेच आश्चर्य वाटते. स्वत:च्या मतदार संघातील सी-वर्ल्डबद्दल ना विधीमंडळात बोलतात. ना मतदार संघात बोलतात. यामधून नाईक यांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. राणे साहेबांना रत्नागिरीमध्ये हायवे चौपदरीकरणाला बोलविले गेले हे कदाचित आमदार नाईकांना खुपत असेल. त्या जाहीर कार्यक्रमातही राणे साहेबांचे भाषण ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर तेथेही राणे साहेबांची ताठ आणि परखड भूमिका घेतली, कोकणी माणसाच्या हिताची होती. तीच बोलून दाखविली. चौपदरीकरणाचा मोबदला जास्तीत जास्त मिळावा ही खरी तर आमदार नाईकांची पण भूमिका असली पाहीजे होती. पण राजकारणापलीकडे त्यांचा काहीच स्वार्थ नाही हेच त्यांनी दाखवून दिले. (वार्ताहर)