शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

भवितव्याच्या चिंतेमुळे वैभव नाईक पालकमंत्र्यांना भेटले असावेत, नितेश राणे यांचा टोला

By सुधीर राणे | Updated: February 17, 2024 15:23 IST

कणकवली: आमदार  वैभव नाईक आणि त्यांचे कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत. ते मूळ काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेबाबत ...

कणकवली: आमदार  वैभव नाईक आणि त्यांचे कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत. ते मूळ काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेबाबत सांगणे हे हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा एवढा झंझावाती झाला की, थेट त्यांच्या आमदाराला येऊन आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घ्यावी लागली. असा टोला लगावतानाच त्या झंझावाती दौऱ्याचे विश्लेषण करायचे म्हटले तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कोणाचाही विश्वास नाही म्हणून वैभव नाईक आपल्या भवितव्याबाबत काही होऊ शकते का, हे विचारायला आले असतील. पण, रवींद्र चव्हाण यांना भाजप व संघटनेपेक्षा मोठे काही नाही आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. भाजप नेते तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली.त्यावरून जिल्ह्यातिल नागरिकांमध्ये सध्या चर्चा रंगली आहे. त्याबाबत नितेश राणे म्हणाले, वैभव नाईक आपल्या भवितव्याच्या चिंतेमुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटले असतील. संजय राऊत व त्यांच्या मालकाला अचानकच शेतकऱ्यांची चिंता वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम आमच्या भाजप सरकारने केले आहे. जे काँग्रेसला जमले नाही ते भाजप सरकारने केले. शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र, कोकणातल्या शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नाही.कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मनोज जरांगे-पाटील हे समाजाच्या हितासाठी लढत आहेत. फसवणूक होणार नाही. जरांगेनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करावे. जरांगेनी राजकीय वक्तव्य करू नये. आपण समाज बांधव म्हणून एकत्र काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जरांगे बोलल्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी राजकीय वक्तव्य बंद करावे, असेही राणे यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, पण , तेच लोक आता तोंडघशी पडले आहेत. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशीर्वाद होता, मात्र नंतर अजित पवार यांना व्हीलन करण्यात आले, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे