शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:05 IST

गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला. दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

ठळक मुद्देकोळंब पूल बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर, ग्रामस्थ संतप्त बांधकाम अधिकारी व ठेकेदार धारेवर

मालवण : गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला.दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पुलावर उपस्थित झालेल्या बांधकाम अधिकारी प्रकाश चव्हाण व ठेकेदार यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

कोळंब पूल दुरुस्ती बांधकामासाठी खाडीत पंप लावून खाऱ्या पाण्याचा उपसा सुरू होता.चार दिवस ठेकेदार खाडीतील पाणी वापर करत होता. त्यामुळे सुरू असलेल्या कामाची तपासणी करावी. तसेच दर्जाहीन काम करणाºया ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका लवकरात लवकर दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर, माजी अध्यक्ष गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, बाळा आंबेरकर, नितीन आंबेरकर, सखाराम मालाडकर, संदीप शेलटकर, बाळा पराडकर, जितेंद्र भोजने, सुरेश बापर्डेकर व अन्य उपस्थित होते.दरम्यान, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेनंतर पूल दुरुस्तीचे काम करणाºया कामगारांनी पाणी उपसासाठी लावलेला पंप लपवून ठेवला. मात्र पंपाद्वारे खाडीपात्रातून सुरू असलेल्या पाणी उपसाचे फोटो व व्हिडीओ ग्रामस्थांनी काढून ठेवल्याने ठेकेदारासह बांधकाम विभाग कात्रीत सापडला आहे.ठेकेदाराला नोटीस; प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे; आमदारांच्या आश्वासनाचे काय?कोळंब पूल दुरुस्ती पूर्ण करण्यास ठेकेदारास १५ मे पर्यंत वाढीव मुदत मुख्य अभियंता यांनी दिली आहे. त्यापूर्वी काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे. काम होताच सुरुवातीला दुचाकी सुरू होतील. मात्र बस व मोठी वाहने वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुलाची तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.लोकसभा निवडणूक काळात आमदार वैभव नाईक यांनी कोळंब पूल १ मे पासून वाहतुकीस खुला होईल असे सांगितले होते. मात्र, पुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आमदारांचे आश्वासन निवडणूक काळासाठी होते का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तर आश्वासन देण्यापूर्वी आमदारांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का? असा सवाल कोळंब पूल संघर्ष समितीचे सेक्रेटरी प्रमोद कांडरकर यांनी उपस्थित केला आहे.संथ गतीने सुरू असलेले काम तसेच बांधकामावर खारे पाणी मारण्याचा सुरू असलेला प्रकार याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. नोटीसीची प्रत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग