शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आगामी सणांमुळे येतील सुगीचे दिवस, व्यापारी, छोट्या उद्योजकांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:49 IST

coronavirus, kankavli, market, sindhudurgnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारच्या खरेदीला ब्रेक लागला होता. आता अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत आली असून, कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व खरेदी- विक्रीला गती मिळाली आहे. आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायातही चांगली उलाढाल होईल आणि सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यापारी तसेच लहान-मोठे उद्योजक व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देआगामी सणांमुळे येतील सुगीचे दिवस, व्यापारी, छोट्या उद्योजकांना आशाकोरोना रुग्णांच्या नियंत्रणामुळे सकारात्मक स्थिती, बाजारपेठांमध्ये लगबग वाढली

सुधीर राणे कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारच्या खरेदीला ब्रेक लागला होता. आता अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत आली असून, कोरोना रुग्णांची संख्याही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रलंबित कामे व खरेदी- विक्रीला गती मिळाली आहे. आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायातही चांगली उलाढाल होईल आणि सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यापारी तसेच लहान-मोठे उद्योजक व्यक्त करीत आहेत.देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र सरकारने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले होते. परिणामी उद्योग, व्यवसायासह खरेदीही ठप्प झाली. सध्या सुरू असलेल्या या वर्षात प्रत्येकाने केवळ आपला व कुटुंबीयांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर अनावश्यक फिरू नये असे आवाहन केल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू वगळता कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हौस, मौजमजा यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी पूर्णतः थांबविली होती. लॉकडाऊनमुळे मध्यमवर्गीय व सामान्य घटकांवर आर्थिक संकट कोसळले होते. अनेकांना रोजगार मिळू शकला नाही. काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अत्यंत कठीण दिवस अनेकांना जीवनात अनुभवायला मिळाले.

अनेकांना फक्त जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून त्यातूनच प्रपंच चालवावा लागला. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पुन्हा सामान्यवर्गाला रोजगार मिळू लागला आहे. मध्यमवर्गीयांची उलाढालही सुरू झाली आहे. परंतु कपड्यांसह इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीला म्हणावी तशी गती अजूनही मिळालेली नाही.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, उपचारासाठी करावी लागणारी कसरत अशा भीतीमुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने त्याबद्दलची भीती कमी झाली. त्यामुळे हळूहळू इतर आवश्यक वस्तूंची खरेदी-विक्री, व्यवहार सुरू होत आहेत. दसरा, दिवाळीसारख्या मोठ्या सणाला दरवर्षी मोठी उलाढाल होते. यावर्षी कोरोनामुळे जवळजवळ सहा महिने आर्थिक उलाढालीला लागलेला ब्रेक आता निघत असून, सर्व प्रकारच्या खरेदी - विक्रीला उत्साही वातावरण निर्माण होत आहे.यानिमित्ताने कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, वाहन, गृह अशा प्रलंबित असलेल्या खरेदी - विक्रीचे व्यवहार व व्यवसायातील उलाढाल होण्याची आशा अनेकांना निर्माण झाली आहे. तशी स्थिती निर्माण व्हावी यासाठी चातकासारखी वाट अनेकजण बघत आहेत.

वाट पाहत आहोतकोरोनामुळे आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आर्थिक घडीच पूर्णतः विस्कटली असून ती पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी बाजारपेठेत ग्राहक वाढणे गरजेचे आहे. दसरा, दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी ग्राहक पुन्हा बाजारपेठेकडे वळतील अशी शक्यता वाटते. त्यामुळे आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत.- संदीप माणगावकर, व्यापारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग