शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समाज साहित्य संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 13:33 IST

यावर्षी या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे.

सावंतवाडी : समाज साहित्य संघटना, सिंधुदुर्ग या तळकोकणात कार्यरत असणाऱ्या साहित्य चळवळीच्या बोधचिन्हाचे अनावरण श्रीराम वाचन मंदिर येथे करण्यात आले. कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण झाले. या चिन्हाची निर्मिती मालवण येथील चित्रकार वनिता पांजरी यांनी केली आहे. यावर्षी या संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते महेश पेडणेकर, कवयित्री कल्पना बांदेकर, प्रज्ञा मातोंडकर, विजय चव्हाण, संजना चव्हाण, प्रकाशक हरिहर वाटवे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.‘समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते.  त्यामुळे साहित्यिकांनी समाजाला जोडून राहिले पाहिजे. त्यांनी तळातल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करायला हवं. आपल्या लेखनातून व्यवस्थेत हस्तक्षेप करायला हवा. कष्टकरी- शोषित वर्गाच्या हातात पुस्तक देणे याचाच अर्थ तो ज्ञानाकडे जाणे आता गरजेचे झाले आहे. या संकल्पनेतून हे बोधचिन्ह चित्रकार श्रीमती पांजरी यांनी तयार केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरु सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार कृष्णराव अर्जून केळूसकर यांच्या स्मरणार्थ या संस्थेतर्फे यावर्षीपासून समाज साहित्य क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. त्याच बरोबर समाज साहित्य कादंबरी- कथा, कविता, समिक्षा ग्रंथांसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग