शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

त्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:49 IST

येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.

ठळक मुद्देत्या अत्यवस्थ महिलेचा अखेर मृत्यू, पोलीस दत्ता देसार्इंच्या प्रयत्नांना अपयशमोती तलावात उडी मारून आत्महत्या

सावंतवाडी : खाकी वर्दी म्हटली की समाजात सर्वत्र तिरस्कार केला जातो. पण खाकी वर्दीतील सर्वच माणसे वाईट नसतात. त्यांच्यात माणुसकीचा झरा असतोच. असेच काहीसे चित्र सावंतवाडीत पहायला मिळाले. शनिवारी ज्युस्तीनगर येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला अत्यवस्थ स्थितीत गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी तिचे निधन झाले.सावंतवाडीतील मोती तलावात शनिवारी जिजा तुकाराम ब्राम्हणेकर (रा. ज्युस्तीनगर, सावंतवाडी) या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वांसमोरच या महिलेने तलावात उडी मारली. हे अनेकांनी पाहिले. त्यानंतर आरडाओरड झाली. सध्या संचारबंदी असल्याने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोती तलावाच्या काठी वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी असतात.एका महिलेने तलावात उडी मारली याची माहिती वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट मोती तलावात उडी मारली. महिला पाण्यात आत जाणार असे वाटत असतानाच देसाई यांनी त्या महिलेला पाण्याच्या वर आणले.नंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनीही त्या महिलेला आधार देत वर घेतले. ती महिला बेशुध्द होती. तिला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे तिच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले पण ती बेशुध्द असल्याने तसेच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी या महिलेचे निधन झाल्यामुळे सर्वांनीच केलेले प्रयत्न शेवटी अपयशी ठरले.खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन मोती तलावाच्या काठावर देसार्इंसारखे पोलीस नसते तर त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. पाच वर्षांपूर्वीही दत्ता देसाई हे सावंतवाडीत कार्यरत होते.त्यावेळी देसाई यांनी तलावात पडणाऱ्या तसेच पडलेल्या अनेकांना वाचविले आहे. सावंतवाडीची वाहतूक व्यवस्था म्हणजे देसाई असे एक समीकरण झाले होते. देसाई यांची बदली झाली तर त्यांना पुन्हा सावंतवाडीत आणा, अशी अनेकांनी मागणी ही केली होती.मात्र, पाच वर्षांनी देसाई हे पुन्हा सावंतवाडीत आले आहे. आणि वाहतूक पोलीस असताना शनिवारी एका महिलेचा पुन्हा एकदा प्राण वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही.त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा समाजासमोर आल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस