शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: August 13, 2022 19:08 IST

विरोधी पक्षच 'अशा' अफवा पसरवत असतो

सावंतवाडी : ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहेत. त्यांची चौकशी भाजपात आल्यावर कुठे थांबणार नाही. कोट्यावधीचे भ्रष्टाचार करायचे आणि ईडीने कारवाई केल्यानंतर आम्ही चोरी केली नाही असं सांगायचे. मग महाराष्ट्रात खासदारासह माजी मंत्री जेलमध्ये कसे गेले असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री मिश्रा म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण एकही मंत्र्यावर आरोप झाला नाही. मात्र काही राज्यात विरोधी पक्षाची सत्ता आहे तेथे अनेक मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या आरोपात अडकले आहेत. ज्याच्यावर कारवाई होते ते भाजपच्या नावाने ओरड मारतात मग चोरी कशासाठी करायची असा सवाल केला. तर ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्याची कुठेही चौकशी थांबणार नसल्याचेही ते म्हणाले. भाजपकडे आले म्हणून चौकशी थांबतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणालाही चौकशीवर संशय असेल किंवा समाधानी नसाल तर यंत्रणे विरोधात तुम्ही न्यायालयात जाऊ शकता असेही ते म्हणाले.विरोधी पक्षच अशा अफवा पसरवत असतोभाजपमध्ये गेल्यावर नेते सुटतात असे सामान्य माणूस म्हणत नाही, त्यांना काही देणे घेणेही नसते. पण विरोधी पक्षच या अफवा पसरवत असतो. कोणी कितीही ओपनिय पोल काढू दे पण राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि पुन्हा राज्यात व केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.'हे' कितपत योग्यराज्यात निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करायची आणि नंतर ज्याच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबत सरकार बनवायचे हे कितपत योग्य आहे. आताचे शिंदे-फडणवीस सरकार चांगले काम करत असून ते यापुढे ही चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, महेश सारंग, शैलेंद्र दळवी, मनिष दळवी, संजू परब लखमसावंत भोसले, राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHome Ministryगृह मंत्रालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय