शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खैरतोड प्रकरणातील फरार दोघा संशयितांना पकडले, वनविभागाची कारवाई

By अनंत खं.जाधव | Updated: August 22, 2023 16:43 IST

चौकशीअंती अटक

सावंतवाडी : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत पणे खैराची तोड प्रकरणातील फरार आरोपी  संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे (दोघे रा.वेत्ये सावंतवाडी) या दोघाही आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले. काल, सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर यातील लहू गावडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे.इन्सुली येथील वनरक्षक संग्राम पाटील यांना क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात फिरती करताना काही लोक खैराची तोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांनी मिळून राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या आरोपींवर  झडप घालून रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. पण यातील दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तर तिसरा आरोपी लवू एकनाथ गावडे याला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.फरार आरोपीचा शोध सुरू होता. ते वेत्ये येथील आहेत. त्यामुळे सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीमसह वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर पसार झालेल्याचा शोध घेत होते. त्यातच सोमवारी संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे हे दोघेही वनविभागाच्या पथकाला आढळून आले असून वनविभागाकडून त्याना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असून त्याना अटक ही करण्यात आले आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.हा तपास सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल-पृथ्वीराज प्रताप, प्रमोद राणे, वनरक्षक-संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, चंद्रकांत पडते हे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग