शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पर्यावरण समतोलासाठी स्वत:पासून प्रयत्न करा

By admin | Updated: June 9, 2016 01:54 IST

मधुकर बाचुळकर : पर्यावरण सप्ताहानिमित्त सिंधुदुर्गनगरीत चर्चासत्र

सिंधुदुर्गनगरी : पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभिर्याने विचार करून कोणी काही तरी करेल यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करा. केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरूवात करा, असे आवाहन जेष्ठ संशोधक प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे केले.पर्यावरण सप्ताहानिमित्त येथील नवीन नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप या विषयावर डॉ. बाचुळकर बोलत होते. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तथापि सध्याच्या काळात पर्यावरण समतोल ही मानवाच्या दृष्टीकोनातून तसेच या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी महत्वाची गरज असल्याचे सांगून डॉ. बाचुळकर म्हणाले की, वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, कार्बनडॉयआॅक्साईडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदींमुळे पर्यावरणास हानी पोहचत आहे.पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे तसेच विविध वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या आवरणाला खिंडार पडले आहे. यामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण तडक पृथ्वीवर येतात. यामुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका आहे. तापमान वाढीने उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे देशातील समुद्र किनाऱ्यावरील लोकवस्ती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्र्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. या सर्वांचा प्रत्येकाने विचार करायला हवा असे सांगून डॉ. बाचुळकर म्हणाले की, वृक्ष लागवड करणे, तो वृक्ष सुव्यवस्थित वाढविणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, क्लोरोफ्युरो कार्बन उत्सर्जित करणाऱ्या साधनांचा वापर टाळणे, सौर उर्जेचा वापर वाढविणे, वाहनांचा वापर कमीत - कमी करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, यासारखे वैयक्तिक स्तरावर आपण प्रयत्न केल्यास पर्यावरण पूरक कार्यास आपण निश्चित हातभार लावू शकतो.निसर्गात दोन घटक महत्वाचे आहेत निर्जीव व सजीव. निर्जीव म्हणजे पंचमहाभूते यामध्ये हवा, पाणी, जमिन-माती, प्रकाश व उर्जा. या पाच बाबी प्रदूषणमुक्त ठेवणे ही मानवाची जबाबदारी आहे. असे सांगून बाचुळकर म्हणाले की, लोकसंख्या वाढती त्याप्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती वाढत नाही. नैसर्गिक चक्र अबाधित राखून पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लागवड व त्याची जपणूक करावी असेही त्यांनी स्पष्ट केले. वामन पंडीत यांनी प्रारंभी डॉ. बाचुळकर यांचा परिचय करून दिला. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी स्वागत केले. या व्याख्यानास जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)