शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:48 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्दे वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचणवाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्रास

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गाबरोबरच आचरा रस्त्यावरही वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. नरडवे नाका ते मुख्य चौकापर्यंत प्रवास करायचा म्हटल्यावर कणकवलीतील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून या रस्त्यावर आपला जीव केव्हा जाईल? हे सांगता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.या मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. त्याचे परिणाम वाहतूक कोंडीवर दिसुन येत आहेत. तसेच या महामार्गावर विक्रेते , व्यावसायिक यांचे अतिक्रमण देखील मोठया प्रमाणात झाले असुन त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.चौपदरीकरणकामाबाबत नाराजीकणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्वसामान्य जनता, वाहन चालक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेणे आवश्यक आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक तेवढी जागा मिळाल्यानंतर स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केला आहे. त्याबद्दल कणकवलीकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असून त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.शहरात वाहतूक पोलिसांची आवश्यकता!कणकवली शहरातील मुख्य चौकात दोन वाहतूक पोलीस असतात. मात्र, डीपी रोड, छत्रपती शिवाजी चौक , नरडवे नाका याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. असे झाले तर वाहतुकीचे सुनियोजन होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग