शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:48 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्दे वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचणवाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्रास

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गाबरोबरच आचरा रस्त्यावरही वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. नरडवे नाका ते मुख्य चौकापर्यंत प्रवास करायचा म्हटल्यावर कणकवलीतील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून या रस्त्यावर आपला जीव केव्हा जाईल? हे सांगता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.या मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. त्याचे परिणाम वाहतूक कोंडीवर दिसुन येत आहेत. तसेच या महामार्गावर विक्रेते , व्यावसायिक यांचे अतिक्रमण देखील मोठया प्रमाणात झाले असुन त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.चौपदरीकरणकामाबाबत नाराजीकणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्वसामान्य जनता, वाहन चालक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेणे आवश्यक आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक तेवढी जागा मिळाल्यानंतर स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केला आहे. त्याबद्दल कणकवलीकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असून त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.शहरात वाहतूक पोलिसांची आवश्यकता!कणकवली शहरातील मुख्य चौकात दोन वाहतूक पोलीस असतात. मात्र, डीपी रोड, छत्रपती शिवाजी चौक , नरडवे नाका याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. असे झाले तर वाहतुकीचे सुनियोजन होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग