शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:48 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्दे वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचणवाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही त्रास

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गाबरोबरच आचरा रस्त्यावरही वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. नरडवे नाका ते मुख्य चौकापर्यंत प्रवास करायचा म्हटल्यावर कणकवलीतील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून या रस्त्यावर आपला जीव केव्हा जाईल? हे सांगता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.या मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. त्याचे परिणाम वाहतूक कोंडीवर दिसुन येत आहेत. तसेच या महामार्गावर विक्रेते , व्यावसायिक यांचे अतिक्रमण देखील मोठया प्रमाणात झाले असुन त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.चौपदरीकरणकामाबाबत नाराजीकणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्वसामान्य जनता, वाहन चालक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेणे आवश्यक आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक तेवढी जागा मिळाल्यानंतर स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केला आहे. त्याबद्दल कणकवलीकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असून त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.शहरात वाहतूक पोलिसांची आवश्यकता!कणकवली शहरातील मुख्य चौकात दोन वाहतूक पोलीस असतात. मात्र, डीपी रोड, छत्रपती शिवाजी चौक , नरडवे नाका याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. असे झाले तर वाहतुकीचे सुनियोजन होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग