शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:55 IST

केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल.

सावंतवाडी : केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल. पण चिपी विमानतळाला फक्त २५ परवानग्या असताना पालकमंत्री दीपक केसरकर हे आपल्या स्वत:च्या हट्टापायी बुधवारी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत, अशी जोरदार टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जर सरकारी कार्यक्रम असेल तर केसरकर यांनी त्या विमानात बसून यावे, असे जोरदार आवाहनही आमदार राणे यांनी दिले आहे.आमदार नितेश राणे हे गोव्यावरून कणकवलीकडे जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमानचे अध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, मनीष दळवी, सभापती पंकज पेडणेकर, नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक आदी उपस्थित होते.आमदार राणे म्हणाले, चिपी विमानतळावर बुधवारी ट्रायल विमान उतरवण्यात येणार आहे. मात्र, या विमान उतरण्यास अद्यापपर्यंत केंद्र सरकार किंवा विमान पत्तन विभागाची कोणतीही परवानगी मिळाली नाही. प्रत्यक्षात ६५ परवानग्यांची गरज असताना अद्यापपर्यंत २५ परवानग्या मिळाल्या आहेत. असे असताना मंत्री केसरकर हे स्वत:च्या हट्टासाठी खासगी उद्योजकांचे विमान उतरवत आहेत.बुधवारी मुंबईहून येणाऱ्या विमानात पायलट, को-पायलट एवढेच जण असणार आहेत. कोणताही अधिकारी किंवा मंत्री असणार नाही. एवढेच काय, विमान उतरवण्याचा सरकारी कार्यक्रम आहे, असे मंत्री केसरकर भासवत आहेत. तर त्यांनी स्वत: या विमानातून आले पाहिजे होते. ते का येत नाहीत, असा सवाल आमदार राणे यांनी केला आहे. तसेच विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे बुधवारी रात्री मालवणला येत आहेत. मग ते ट्रायल लँडिंगसाठी दुपारी का येत नाहीत? यावरूनच जनतेची फसवणूक करण्याचे काम मंत्री केसरकर यांनी सोडून द्यावे. मी स्वत: याबाबत विमान पत्तनच्या अधिकाºयांशी बोललो आहे. त्यांनी मला सविस्तर माहिती दिली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.जे खासगी विमान उतरणार आहे, त्यातून गणपतीची मूर्तीही आणण्यात येणार आहे. यातून भावनिकतेचे राजकारण करण्याचा मंत्री केसरकर यांचा डाव आहे. आम्ही यातून कोणतेही राजकारण करणार नाही किंवा त्यांना विरोध करणार नाही. जनतेला सर्व काही हळूहळू समजेल. पण चिपी विमानतळावर खासगी उद्योजकांचे विमान उतरत असतील तर आमचेही विमान उतरण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी विमान पत्तन विभागाकडे केली असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.एकेकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून चिपीकडे पाहिले जात होते. पण आता विमानतळाची धावपट्टी कमी करण्यात आली आहे. गोव्याचे मोपा विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी  चिपी विमानतळाचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. यामागे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असून, ते खºया अर्थाने कोकणचे कसई आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.चौकटमंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केलीबांदा येथे आयटी हब आणण्यात आली. मात्र त्याचे मुख्य कार्यालय हे आपल्या इमारतीत ठेवले. जेणे करून आपणास अडीच ते तीन लाख भाडे मिळावे. हीच त्याच्या मागची धारणा आहे. जनतेची बेरोजगारी दूर करण्यापेक्षा मंत्री केसरकर यांनी स्वत:ची बेरोजगारी दूर केली आहे. एवढी कॉम्प्लेक्स आहे, मग यांना आपलेच कॉम्प्लेक्स कसे काय दिसले, असा सवालही आमदार राणे यांनी केला आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर