शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

खचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:09 IST

बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रशासनाला सुचविले.

ठळक मुद्देखचलेल्या रस्त्यावरून वाहतूक, आंबोली घाटातील प्रकार बांधकाम विभागाने हात झटकले, पोलिसांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज

सावंतवाडी : बावीस दिवसांनंतर चार दिवसांपूर्वी आंबोली घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत मुख्य धबधब्याजवळ खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात बांधकाम विभागाला यश आले नसल्याने बांधकाम विभागाने येथून एकेरी वाहतूक सुरू करावी, असे पोलीस प्रशासनाला सुचविले.

पण बांधकाम विभागाचे आदेशच पोलिसांनी धाब्यावर बसवित खचलेल्या ठिकाणावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने हे अपघातास निमंत्रण देण्यासारखे आहे. यावर मात्र बांधकाम विभागाने हात झटकले असून पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबोली घाटरस्ता खचला होता. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुरुवातीला आंबोली घाटातून दिवसाची वाहतूक सुरू ठेवावी असे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानंतर घाटाचे काही अंशी काम पूर्ण झाल्यानंतर छोटी वाहने दिवस-रात्र सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. तर अलीकडेच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातून एसटी वाहतूक सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.मात्र, ही वाहतूक सुरू करीत असताना बांधकाम विभागाने पोलीस प्रशासनास पत्र लिहून व पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्य धबधब्याजवळ रस्ता खचला आहे त्या रस्त्याच्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू केली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू करावी असे सांगितले होते. तसेच तेथे पोलीसही ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती.आंबोली घाट हा वाहतुकीसाठी सुरक्षित घाट म्हणून ओळखला जायचा. मात्र, पाच वर्षांपूर्वी याठिकाणी मोठी दरड कोसळली आणि घाटरस्ता बंद पडला होता. त्यानंतर अलीकडच्या पावसाळ्यातही घाटातील धबधब्याकडील काही भागही कोसळला होता. त्यामुळे आता पुन्हा घाट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.रात्रीच्या वाहतुकीवर नियंत्रण नाहीदिवसाचा एक पोलीस या घाटातून वाहतूक सुरळीत करीत होता. तर सायंकाळच्या वेळी पोलिसच नसल्याने आंबोली घाटातून मुख्य धबधब्यासमोरून दुहेरी वाहतूक सुरू होती. कोणाचे नियंत्रणही या वाहतुकीवर नव्हते.त्यातच मुख्य धबधबा असल्याने अनेकजण धबधब्यासमोर आपल्या गाड्या लावून फोटोसेशनही करीत होते. यामुळे अपघात होऊ शकतो याची थोडीही जाणीव या वाहतूकदारांना नव्हती.त्यातच धबधब्यासमोर पोलीस नसल्याने या हौशी पर्यटकांना नियंत्रणात आणणेही कठीण होत होते. त्यामुळे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात तरी याठिकाणी थांबून वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी आंबोलीवासीयांकडून होत आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग