शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: August 26, 2014 21:49 IST

व्यापाऱ्यांसह नागरिकांना त्रास ; पोलिसांची भूमिका महत्त्वाची, किमान उत्सवकाळात प्रयत्न करावेत

वैभववाडी : वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ही कित्येक वर्षांची बारमाही समस्या आहे. त्यामध्ये वर्षभरापूर्वी खोदलेल्या गटाराने आणखीनच भर घातली आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. गणेशोत्सव काळात खासगी वाहनांची संख्या वाढणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे किमान उत्सवकाळात तरी पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून होत आहे.शहराचे क्षेत्रफळ मर्यादीत असले तरी बाजारपेठेतून जाणारा मार्ग एकच आहे. शिवाय रस्त्यालगत मोठ्या साईडपट्ट्या नसल्याने स्थानिक वाहने रस्त्याच्या बाजूलाच थांबवली जातात. त्यामुळे रस्त्यावरून दोन मोठी वाहने सुटताना प्रचंड अडचण होताना दिसते. या नेहमीच्या कसरतीत सणासुदीच्या काळात बाहेरून येणाऱ्या वाहनांची भर पडते. बाहेरून येणारी वाहने अस्ताव्यस्त थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ उडत आहे.बसस्थानक परिसरात समस्या गंभीरबसस्थानक ते संभाजी चौक हा संपूर्ण परिसर सततच्या वर्दळीने गजबजलेला दिसतो. याच परिसरात रिक्षांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकामने या भागात एकाबाजूने गटार खोदून ठेवल्याने सर्वच वाहनांचा थांबा अगदी रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढविण्यात एक प्रकारची भरच पडली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बाजारपेठेत एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून त्याचा फटका व्यापारी बांधवांना बसत आहे. त्याचप्रमाणे संभाजी चौकातील वाहनांची गर्दी सर्वांनाच डोकेदुखी ठरत असून तेथील गर्दीमुळे अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे गणशोत्सव काळात संभाजी चौक खुला ठेवण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)शांतता समिती सभेनंतरही दुर्लक्षचतहसीलदार विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा झाली. सभेत व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उद्देशाने बसस्थानक, दत्तमंदिर चौक, संभाजी चौकात पोलीस तैनात ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अधूनमधून कधीतरी ‘ट्रॅफिक पोलीस’ दिसत आहेत.वेग आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रासबाजारपेठेतील मुख्य रस्त्याला गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. विशेषत: कधीतरी बाजारपेठेत फेरफटका मारणारे वाहतूक पोलीसही सुसाट वाहनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे गर्दीच्या काळात बाजारपेठेत अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सुसाट वाहन चालकांवर कडक कारवाई होत नसल्याने वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्याशिवाय अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. तेव्हा खोळंबलेली वाहने कर्णकर्कश ‘हॉर्न’ वाजवून शांतता भंग करतात. मात्र, त्यांच्यावरही कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गणेशोत्सव काळात मुंबईसह अन्य शहरातून खासगी वाहनाने लोक गावात येतात. परंतु असंख्य वाहनांच्या दर्शनी भागावर पोलीस, प्रेस, महाराष्ट्र शासन, आॅन गव्हर्नमेंट ड्युटी अशा पाट्या दिसतात. इतकेच नव्हे तर लाल व अंबर दिव्यांच्या गाड्याही फिरत असतात. मात्र अशा पाट्या टाकलेल्या किंवा दिव्यांच्या वाहनांची तपासणी करून सत्यता पडताळली जात नसल्यानेच अशा प्रकारची वाहनेच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.