शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: August 26, 2014 21:49 IST

व्यापाऱ्यांसह नागरिकांना त्रास ; पोलिसांची भूमिका महत्त्वाची, किमान उत्सवकाळात प्रयत्न करावेत

वैभववाडी : वैभववाडी शहरातील वाहतूक कोंडी ही कित्येक वर्षांची बारमाही समस्या आहे. त्यामध्ये वर्षभरापूर्वी खोदलेल्या गटाराने आणखीनच भर घातली आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. गणेशोत्सव काळात खासगी वाहनांची संख्या वाढणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे किमान उत्सवकाळात तरी पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून होत आहे.शहराचे क्षेत्रफळ मर्यादीत असले तरी बाजारपेठेतून जाणारा मार्ग एकच आहे. शिवाय रस्त्यालगत मोठ्या साईडपट्ट्या नसल्याने स्थानिक वाहने रस्त्याच्या बाजूलाच थांबवली जातात. त्यामुळे रस्त्यावरून दोन मोठी वाहने सुटताना प्रचंड अडचण होताना दिसते. या नेहमीच्या कसरतीत सणासुदीच्या काळात बाहेरून येणाऱ्या वाहनांची भर पडते. बाहेरून येणारी वाहने अस्ताव्यस्त थांबवली जातात. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ उडत आहे.बसस्थानक परिसरात समस्या गंभीरबसस्थानक ते संभाजी चौक हा संपूर्ण परिसर सततच्या वर्दळीने गजबजलेला दिसतो. याच परिसरात रिक्षांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकामने या भागात एकाबाजूने गटार खोदून ठेवल्याने सर्वच वाहनांचा थांबा अगदी रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढविण्यात एक प्रकारची भरच पडली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बाजारपेठेत एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून त्याचा फटका व्यापारी बांधवांना बसत आहे. त्याचप्रमाणे संभाजी चौकातील वाहनांची गर्दी सर्वांनाच डोकेदुखी ठरत असून तेथील गर्दीमुळे अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे गणशोत्सव काळात संभाजी चौक खुला ठेवण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)शांतता समिती सभेनंतरही दुर्लक्षचतहसीलदार विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा झाली. सभेत व्यापारी व गणेशोत्सव मंडळांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उद्देशाने बसस्थानक, दत्तमंदिर चौक, संभाजी चौकात पोलीस तैनात ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अधूनमधून कधीतरी ‘ट्रॅफिक पोलीस’ दिसत आहेत.वेग आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रासबाजारपेठेतील मुख्य रस्त्याला गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. विशेषत: कधीतरी बाजारपेठेत फेरफटका मारणारे वाहतूक पोलीसही सुसाट वाहनांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे गर्दीच्या काळात बाजारपेठेत अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सुसाट वाहन चालकांवर कडक कारवाई होत नसल्याने वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्याशिवाय अस्ताव्यस्त थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. तेव्हा खोळंबलेली वाहने कर्णकर्कश ‘हॉर्न’ वाजवून शांतता भंग करतात. मात्र, त्यांच्यावरही कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गणेशोत्सव काळात मुंबईसह अन्य शहरातून खासगी वाहनाने लोक गावात येतात. परंतु असंख्य वाहनांच्या दर्शनी भागावर पोलीस, प्रेस, महाराष्ट्र शासन, आॅन गव्हर्नमेंट ड्युटी अशा पाट्या दिसतात. इतकेच नव्हे तर लाल व अंबर दिव्यांच्या गाड्याही फिरत असतात. मात्र अशा पाट्या टाकलेल्या किंवा दिव्यांच्या वाहनांची तपासणी करून सत्यता पडताळली जात नसल्यानेच अशा प्रकारची वाहनेच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत.