शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अडचणींच्या विळख्यात पारंपरिक शेती

By admin | Updated: June 26, 2015 22:08 IST

निसर्गाचा लहरीपणा : महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

सुरेश बागवे- कडावल -गोठ्यातील गोधन घटल्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत नाही. शेत आणि जीवन जाळणाऱ्या धोकादायक रासायनिक खतांवरच शेतीचा सर्व डोलारा उभा असून दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेतकरी दिवसेंदिवस हैराण होत आहे. त्यातच वन्य प्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा तसेच अल्पभात उत्पादन व कमी दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाल्यामुळे कडावल परिसरात भातपेरणीची कामेही वेळेत पार पडली. सध्या येथील शेतकरी उखळीची नांगरट कण्यात व्यस्त झाले आहेत. शेतनांगरणी जोरात सुरू असली, तरी बियाणे, खते, जनावरे, मजुरी आणि शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व बाबींना महागाईने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक भात बियाण्यांचा वापर टाळत सुधारित व संकरित वाणांना पेरणीसाठी प्राधान्य दिले आहे. कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा एककाडी, दोन काडीसारख्या संकरित वाणांसह इतर आधुनिक वाणांचा सर्रास वापर केला आहे. यामध्ये लोकनाथ, गोरखनाथ, सुरूची, मोती गोल्ड, सारथी, स्वाद, सुपरसोना, रुपा फ्रंटलाईन तसेच इतर वाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व वाणांना रासायनिक खतांसह शेणखताची आवश्यकता असते. मात्र, गोठ्यातील गुरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची सर्व भिस्त धोकादायक रासायनिक खतांवरच आहे. शेतीचा सर्व डोलारा शेत आणि माणसाचे जीवन जाळणाऱ्या रासायनिक खतांवरच अवलंबून असताना दुसरीकडे वाढत्या महागाईचे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीशी निगडित सर्वच बाबींमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. यंदा शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले. पॉवर ट्रेलरचे भाडे प्रतितास साडेतीनशे रुपये झाले आहे, तर प्रतिमजूर मजुरीचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित व संकरित बियाण्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाचा सामना करावा लागत आहे. कुडाळ तालुका भौगोलिक परिस्थितीमुळे खलाटी आणि वलाटी अशा दोन भागात विभागला गेला आहे. (वार्ताहर)अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईतगगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे भाताच्या दरात सुधारणा झालेली नाही. प्रति क्विंटलचा दर सरासरी एक हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. शेतीशी संबंधित वाढती महागाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा, कमी उत्पादन व भात उत्पादनास मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.