शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

अडचणींच्या विळख्यात पारंपरिक शेती

By admin | Updated: June 26, 2015 22:08 IST

निसर्गाचा लहरीपणा : महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

सुरेश बागवे- कडावल -गोठ्यातील गोधन घटल्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत नाही. शेत आणि जीवन जाळणाऱ्या धोकादायक रासायनिक खतांवरच शेतीचा सर्व डोलारा उभा असून दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेतकरी दिवसेंदिवस हैराण होत आहे. त्यातच वन्य प्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा तसेच अल्पभात उत्पादन व कमी दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाल्यामुळे कडावल परिसरात भातपेरणीची कामेही वेळेत पार पडली. सध्या येथील शेतकरी उखळीची नांगरट कण्यात व्यस्त झाले आहेत. शेतनांगरणी जोरात सुरू असली, तरी बियाणे, खते, जनावरे, मजुरी आणि शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व बाबींना महागाईने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक भात बियाण्यांचा वापर टाळत सुधारित व संकरित वाणांना पेरणीसाठी प्राधान्य दिले आहे. कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा एककाडी, दोन काडीसारख्या संकरित वाणांसह इतर आधुनिक वाणांचा सर्रास वापर केला आहे. यामध्ये लोकनाथ, गोरखनाथ, सुरूची, मोती गोल्ड, सारथी, स्वाद, सुपरसोना, रुपा फ्रंटलाईन तसेच इतर वाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व वाणांना रासायनिक खतांसह शेणखताची आवश्यकता असते. मात्र, गोठ्यातील गुरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची सर्व भिस्त धोकादायक रासायनिक खतांवरच आहे. शेतीचा सर्व डोलारा शेत आणि माणसाचे जीवन जाळणाऱ्या रासायनिक खतांवरच अवलंबून असताना दुसरीकडे वाढत्या महागाईचे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीशी निगडित सर्वच बाबींमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. यंदा शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले. पॉवर ट्रेलरचे भाडे प्रतितास साडेतीनशे रुपये झाले आहे, तर प्रतिमजूर मजुरीचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित व संकरित बियाण्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाचा सामना करावा लागत आहे. कुडाळ तालुका भौगोलिक परिस्थितीमुळे खलाटी आणि वलाटी अशा दोन भागात विभागला गेला आहे. (वार्ताहर)अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईतगगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे भाताच्या दरात सुधारणा झालेली नाही. प्रति क्विंटलचा दर सरासरी एक हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. शेतीशी संबंधित वाढती महागाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा, कमी उत्पादन व भात उत्पादनास मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.