शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींच्या विळख्यात पारंपरिक शेती

By admin | Updated: June 26, 2015 22:08 IST

निसर्गाचा लहरीपणा : महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

सुरेश बागवे- कडावल -गोठ्यातील गोधन घटल्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत नाही. शेत आणि जीवन जाळणाऱ्या धोकादायक रासायनिक खतांवरच शेतीचा सर्व डोलारा उभा असून दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेतकरी दिवसेंदिवस हैराण होत आहे. त्यातच वन्य प्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा तसेच अल्पभात उत्पादन व कमी दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाल्यामुळे कडावल परिसरात भातपेरणीची कामेही वेळेत पार पडली. सध्या येथील शेतकरी उखळीची नांगरट कण्यात व्यस्त झाले आहेत. शेतनांगरणी जोरात सुरू असली, तरी बियाणे, खते, जनावरे, मजुरी आणि शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व बाबींना महागाईने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक भात बियाण्यांचा वापर टाळत सुधारित व संकरित वाणांना पेरणीसाठी प्राधान्य दिले आहे. कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा एककाडी, दोन काडीसारख्या संकरित वाणांसह इतर आधुनिक वाणांचा सर्रास वापर केला आहे. यामध्ये लोकनाथ, गोरखनाथ, सुरूची, मोती गोल्ड, सारथी, स्वाद, सुपरसोना, रुपा फ्रंटलाईन तसेच इतर वाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व वाणांना रासायनिक खतांसह शेणखताची आवश्यकता असते. मात्र, गोठ्यातील गुरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची सर्व भिस्त धोकादायक रासायनिक खतांवरच आहे. शेतीचा सर्व डोलारा शेत आणि माणसाचे जीवन जाळणाऱ्या रासायनिक खतांवरच अवलंबून असताना दुसरीकडे वाढत्या महागाईचे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीशी निगडित सर्वच बाबींमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. यंदा शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले. पॉवर ट्रेलरचे भाडे प्रतितास साडेतीनशे रुपये झाले आहे, तर प्रतिमजूर मजुरीचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित व संकरित बियाण्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाचा सामना करावा लागत आहे. कुडाळ तालुका भौगोलिक परिस्थितीमुळे खलाटी आणि वलाटी अशा दोन भागात विभागला गेला आहे. (वार्ताहर)अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईतगगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे भाताच्या दरात सुधारणा झालेली नाही. प्रति क्विंटलचा दर सरासरी एक हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. शेतीशी संबंधित वाढती महागाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा, कमी उत्पादन व भात उत्पादनास मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.