शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींच्या विळख्यात पारंपरिक शेती

By admin | Updated: June 26, 2015 22:08 IST

निसर्गाचा लहरीपणा : महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

सुरेश बागवे- कडावल -गोठ्यातील गोधन घटल्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत नाही. शेत आणि जीवन जाळणाऱ्या धोकादायक रासायनिक खतांवरच शेतीचा सर्व डोलारा उभा असून दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे शेतकरी दिवसेंदिवस हैराण होत आहे. त्यातच वन्य प्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा तसेच अल्पभात उत्पादन व कमी दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. यंदा पावसाचे वेळीच आगमन झाल्यामुळे कडावल परिसरात भातपेरणीची कामेही वेळेत पार पडली. सध्या येथील शेतकरी उखळीची नांगरट कण्यात व्यस्त झाले आहेत. शेतनांगरणी जोरात सुरू असली, तरी बियाणे, खते, जनावरे, मजुरी आणि शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व बाबींना महागाईने ग्रासल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पारंपरिक भात बियाण्यांचा वापर टाळत सुधारित व संकरित वाणांना पेरणीसाठी प्राधान्य दिले आहे. कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा एककाडी, दोन काडीसारख्या संकरित वाणांसह इतर आधुनिक वाणांचा सर्रास वापर केला आहे. यामध्ये लोकनाथ, गोरखनाथ, सुरूची, मोती गोल्ड, सारथी, स्वाद, सुपरसोना, रुपा फ्रंटलाईन तसेच इतर वाणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व वाणांना रासायनिक खतांसह शेणखताची आवश्यकता असते. मात्र, गोठ्यातील गुरांची संख्या घटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीची सर्व भिस्त धोकादायक रासायनिक खतांवरच आहे. शेतीचा सर्व डोलारा शेत आणि माणसाचे जीवन जाळणाऱ्या रासायनिक खतांवरच अवलंबून असताना दुसरीकडे वाढत्या महागाईचे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीशी निगडित सर्वच बाबींमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. यंदा शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किमान ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले. पॉवर ट्रेलरचे भाडे प्रतितास साडेतीनशे रुपये झाले आहे, तर प्रतिमजूर मजुरीचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. सुधारित व संकरित बियाण्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाचा सामना करावा लागत आहे. कुडाळ तालुका भौगोलिक परिस्थितीमुळे खलाटी आणि वलाटी अशा दोन भागात विभागला गेला आहे. (वार्ताहर)अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईतगगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे भाताच्या दरात सुधारणा झालेली नाही. प्रति क्विंटलचा दर सरासरी एक हजार रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. शेतीशी संबंधित वाढती महागाई, वन्यप्राण्यांचा उपद्रव, निसर्गाचा लहरीपणा, कमी उत्पादन व भात उत्पादनास मिळणाऱ्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.