शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात वीज समस्येबाबत व्यापारी, नागरिक आक्रमक; महावितरणच्या कार्यालयावर धडक देत विचारला जाब

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 31, 2024 18:35 IST

रजनीकांत कदम कुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी ...

रजनीकांत कदमकुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी कुडाळ-एमआयडीसी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. नागरिकांनी महावितरण विभागाच्या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष व व्यापारी संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेगे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सृती वर्दम, सुनील भोगटे, राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, निकू म्हाडेश्वर, लालू पटेल, सागर तेली, द्वारकानाथ घुर्ये, रत्नाकर जोशी, सतीश वर्दम, सुशील चिंदरकर, सचिन काळप, राजू गवंडे आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

महावितरणच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामकाजामुळे शहरातील ग्राहकांना नाहक मानसिक व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुसती आश्वासने दिली. शहरातील समस्या ‘जैसे थे’च आहेत.वीज महावितरणकडून ग्राहकांना चांगल्या सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. शहरातील वीज वारंवार जात असते. परंतु, एमआयडीसीमधील वीज चोवीस तास कशी सुरू असते, असा सवाल संजय भोगटे यांनी केला. आता जीर्ण झालेले वीज खांब बदलण्याचा प्रस्ताव दिला आहात का, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर अधीक्षक अभियंता पाटील प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.

वीज कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तरे देतातशुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज गेल्यावर संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. जर फोन उचलला तर तुमचे कर्मचारी ग्राहकांना उद्धट भाषेत उत्तरे देतात. त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या, ग्राहकांना चांगल्या भाषेतच उत्तरे दिली पाहिजेत, असे सुनील भोगटे व अभय शिरसाट यांनी पाटील यांना सांगून चांगलेच सुनावले. वीज गेल्यावर तुमचा कर्मचारी फोन उचलेल, असे आम्हाला तुम्ही लेखी लिहून द्या, असे नागरिकांनी सांगितले.

सहकार्य करण्याची विनंती

आज ७५ टक्के ग्राहक वेळेत बिल भरतात. कोरोना काळातही ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरली होती. परंतु तुमचे कर्मचारी त्यांना उद्धट भाषेत उत्तरे देत असतील, तर ग्राहकांनी करायचे तरी काय, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर पाटील याबाबत आपण कर्मचाऱ्यांशी बोलतो. असे सांगितले. ६ ते १५ जूनपर्यंत तुम्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर सर्व सुरळीत होणार आहे. तुम्ही नागरिकांनी आपल्याला सहकार्य करा, अशी विनंती विनोद पाटील यांनी नागरिकांना केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण