शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

कुडाळात वीज समस्येबाबत व्यापारी, नागरिक आक्रमक; महावितरणच्या कार्यालयावर धडक देत विचारला जाब

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 31, 2024 18:35 IST

रजनीकांत कदम कुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी ...

रजनीकांत कदमकुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी कुडाळ-एमआयडीसी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. नागरिकांनी महावितरण विभागाच्या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष व व्यापारी संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेगे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सृती वर्दम, सुनील भोगटे, राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, निकू म्हाडेश्वर, लालू पटेल, सागर तेली, द्वारकानाथ घुर्ये, रत्नाकर जोशी, सतीश वर्दम, सुशील चिंदरकर, सचिन काळप, राजू गवंडे आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

महावितरणच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामकाजामुळे शहरातील ग्राहकांना नाहक मानसिक व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुसती आश्वासने दिली. शहरातील समस्या ‘जैसे थे’च आहेत.वीज महावितरणकडून ग्राहकांना चांगल्या सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. शहरातील वीज वारंवार जात असते. परंतु, एमआयडीसीमधील वीज चोवीस तास कशी सुरू असते, असा सवाल संजय भोगटे यांनी केला. आता जीर्ण झालेले वीज खांब बदलण्याचा प्रस्ताव दिला आहात का, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर अधीक्षक अभियंता पाटील प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.

वीज कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तरे देतातशुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज गेल्यावर संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. जर फोन उचलला तर तुमचे कर्मचारी ग्राहकांना उद्धट भाषेत उत्तरे देतात. त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या, ग्राहकांना चांगल्या भाषेतच उत्तरे दिली पाहिजेत, असे सुनील भोगटे व अभय शिरसाट यांनी पाटील यांना सांगून चांगलेच सुनावले. वीज गेल्यावर तुमचा कर्मचारी फोन उचलेल, असे आम्हाला तुम्ही लेखी लिहून द्या, असे नागरिकांनी सांगितले.

सहकार्य करण्याची विनंती

आज ७५ टक्के ग्राहक वेळेत बिल भरतात. कोरोना काळातही ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरली होती. परंतु तुमचे कर्मचारी त्यांना उद्धट भाषेत उत्तरे देत असतील, तर ग्राहकांनी करायचे तरी काय, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर पाटील याबाबत आपण कर्मचाऱ्यांशी बोलतो. असे सांगितले. ६ ते १५ जूनपर्यंत तुम्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर सर्व सुरळीत होणार आहे. तुम्ही नागरिकांनी आपल्याला सहकार्य करा, अशी विनंती विनोद पाटील यांनी नागरिकांना केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण