शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कुडाळात वीज समस्येबाबत व्यापारी, नागरिक आक्रमक; महावितरणच्या कार्यालयावर धडक देत विचारला जाब

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 31, 2024 18:35 IST

रजनीकांत कदम कुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी ...

रजनीकांत कदमकुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी कुडाळ-एमआयडीसी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. नागरिकांनी महावितरण विभागाच्या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष व व्यापारी संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेगे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सृती वर्दम, सुनील भोगटे, राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, निकू म्हाडेश्वर, लालू पटेल, सागर तेली, द्वारकानाथ घुर्ये, रत्नाकर जोशी, सतीश वर्दम, सुशील चिंदरकर, सचिन काळप, राजू गवंडे आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

महावितरणच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामकाजामुळे शहरातील ग्राहकांना नाहक मानसिक व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुसती आश्वासने दिली. शहरातील समस्या ‘जैसे थे’च आहेत.वीज महावितरणकडून ग्राहकांना चांगल्या सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. शहरातील वीज वारंवार जात असते. परंतु, एमआयडीसीमधील वीज चोवीस तास कशी सुरू असते, असा सवाल संजय भोगटे यांनी केला. आता जीर्ण झालेले वीज खांब बदलण्याचा प्रस्ताव दिला आहात का, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर अधीक्षक अभियंता पाटील प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.

वीज कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तरे देतातशुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज गेल्यावर संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. जर फोन उचलला तर तुमचे कर्मचारी ग्राहकांना उद्धट भाषेत उत्तरे देतात. त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या, ग्राहकांना चांगल्या भाषेतच उत्तरे दिली पाहिजेत, असे सुनील भोगटे व अभय शिरसाट यांनी पाटील यांना सांगून चांगलेच सुनावले. वीज गेल्यावर तुमचा कर्मचारी फोन उचलेल, असे आम्हाला तुम्ही लेखी लिहून द्या, असे नागरिकांनी सांगितले.

सहकार्य करण्याची विनंती

आज ७५ टक्के ग्राहक वेळेत बिल भरतात. कोरोना काळातही ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरली होती. परंतु तुमचे कर्मचारी त्यांना उद्धट भाषेत उत्तरे देत असतील, तर ग्राहकांनी करायचे तरी काय, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर पाटील याबाबत आपण कर्मचाऱ्यांशी बोलतो. असे सांगितले. ६ ते १५ जूनपर्यंत तुम्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर सर्व सुरळीत होणार आहे. तुम्ही नागरिकांनी आपल्याला सहकार्य करा, अशी विनंती विनोद पाटील यांनी नागरिकांना केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण