शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

मुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:44 IST

मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.

ठळक मुद्देमुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा ३५ ते ४0 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न

सावंतवाडी : मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.मात्र, याकडे साधे लक्ष देण्यासही प्रशासनाला वेळ नाही. मोठा पाऊस लागला की सतत येथील कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. मात्र, येथील ग्रामस्थांची ना प्रशासनाला काळजी ना लोकप्रतिनिधींना. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असे ही कुटुंबे विचारीत आहेत.चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थ शरद मोहन नाईक यांनी तेथील लोकांची व्यथा मांडली. ते ऐकून मन हेलावून गेले खरे, पण याकडे आता लक्ष कोण देणार? या कुटुंबांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे. मुसळधार पावसात घरातून पाण्याचे झरे वाहतात. त्यामुळे घराबाहेर आसरा नाही व घरातही राहता येत नाही अशी परिस्थिती तेथील ग्रामस्थांची झाली आहे.याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची शरद नाईक व इतर ग्रामस्थांनी भेट घेऊन आपली कैफियत मांडली.सुमारे पाच फूट पाण्यातून आपल्याला रस्ता पार करावा लागला. दोन्ही बाजूने पाण्याचा वेढा असल्याने लहान मुले, वृद्ध घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. घरातूनही पाणी वाहत आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत, अशी कैफियत त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासमोर मांडली.सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधून चौकुळ बेरडकी चिखलवाडी येथील ग्रामस्थांबाबत तातडीने उपाययोजना करून त्यांचे जीवन सुरक्षित करावे, अशी मागणी केली आहे.

चौकुळ बेरडकी परिसर हा मोठा असला तरी या ग्रामस्थांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असेच यातून दिसून येते. सुमारे ३५ ते ४० घरांमध्ये पावसामुळे पाणी येत असते. त्यामुळे अनेकांचा वर्षानुवर्षे केलेला संसार या पाण्यात वाहून जातो. याची नुकसान भरपाईही त्यांना दिली जात नाही. त्यामुळे यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग