शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:44 IST

मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.

ठळक मुद्देमुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा ३५ ते ४0 कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न

सावंतवाडी : मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.मात्र, याकडे साधे लक्ष देण्यासही प्रशासनाला वेळ नाही. मोठा पाऊस लागला की सतत येथील कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. मात्र, येथील ग्रामस्थांची ना प्रशासनाला काळजी ना लोकप्रतिनिधींना. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असे ही कुटुंबे विचारीत आहेत.चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थ शरद मोहन नाईक यांनी तेथील लोकांची व्यथा मांडली. ते ऐकून मन हेलावून गेले खरे, पण याकडे आता लक्ष कोण देणार? या कुटुंबांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे. मुसळधार पावसात घरातून पाण्याचे झरे वाहतात. त्यामुळे घराबाहेर आसरा नाही व घरातही राहता येत नाही अशी परिस्थिती तेथील ग्रामस्थांची झाली आहे.याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची शरद नाईक व इतर ग्रामस्थांनी भेट घेऊन आपली कैफियत मांडली.सुमारे पाच फूट पाण्यातून आपल्याला रस्ता पार करावा लागला. दोन्ही बाजूने पाण्याचा वेढा असल्याने लहान मुले, वृद्ध घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. घरातूनही पाणी वाहत आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत, अशी कैफियत त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासमोर मांडली.सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधून चौकुळ बेरडकी चिखलवाडी येथील ग्रामस्थांबाबत तातडीने उपाययोजना करून त्यांचे जीवन सुरक्षित करावे, अशी मागणी केली आहे.

चौकुळ बेरडकी परिसर हा मोठा असला तरी या ग्रामस्थांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असेच यातून दिसून येते. सुमारे ३५ ते ४० घरांमध्ये पावसामुळे पाणी येत असते. त्यामुळे अनेकांचा वर्षानुवर्षे केलेला संसार या पाण्यात वाहून जातो. याची नुकसान भरपाईही त्यांना दिली जात नाही. त्यामुळे यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग