शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Sindhudurg News: 'टोल मुक्त सिंधुदुर्ग, ही आमची भूमिका'

By सुधीर राणे | Updated: January 4, 2023 16:27 IST

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलचा भुर्दंड सोसावा लागणारी अशी सुमारे ४० हजार वाहने आहेत. त्या वाहनधारकांना दिलासा मिळावा आणि ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलचा भुर्दंड सोसावा लागणारी अशी सुमारे ४० हजार वाहने आहेत. त्या वाहनधारकांना दिलासा मिळावा आणि मुंबई-गोवा महामार्गावरून जिल्ह्यात फिरताना येथील जनतेला टोलचा भुर्दंड पडू नये. यासाठी टोल मुक्त सिंधुदुर्ग ही आमची भूमिका असून तो एकमेव मुद्दा घेऊन टोल मुक्त संघर्ष समिती कार्यरत आहे.

सर्व सामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना दिलासा देण्याच्या एकमेव हेतूने टोल मुक्तीसाठी संघर्ष केला जात असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कणकवली येथे बुधवारी आयोजित या पत्रकार परिषदेस व्यापारी संघाचे नंदन वेंगुर्लेकर, विलास कोरगावकर, नितीन म्हापणकर, बाळा भिसे आदी उपस्थित होते.यावेळी नितीन वाळके म्हणाले, टोल मुक्ती बाबतीत विचार करताना आम्ही काही मुद्दे सुचविले आहेत. त्यामध्ये शासनाने अथवा संबधित विभागाने ठाणे, मुलुंड भागाप्रमाणे स्वतंत्र लेन स्थानिकांना उपलब्ध करून द्यावी. बांदा ते झाराप जुना रस्ता आजही सुरू आहे. तसा पर्याय उपलब्ध करावा. जुन्या खारेपाटण ते झाराप या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ चे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ मध्ये रुपांतर झाले आहे. हा मुद्दा लक्षात घ्यावा. त्यामुळे स्थानिक लोकांना आता पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. इतर ठिकाणी असे रस्ते नव्याने बनवले जातात.त्या रस्त्यांना पर्याय ठेवलेले आहेत. त्याचा निश्चितपणे विचार व्हावा. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींना आम्ही भेटलो आहोत, आता पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि मंत्री दीपक केसरकर यांना भेटणार आहोत. टोल मुक्ती साठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. सर्वच नेत्यांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाहनांना टोल भरावा लागणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे. ठेकेदार कंपनी निश्चित होईपर्यत आपल्याला वेळ द्या, वेळ पडल्यास तुमच्याबरोबर मी रस्त्यावरच्या लढाईत उतरण्यासाठी तयार असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात आंदोलन होणार नाही. करूळ घाट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्य शासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र, ते काम होईपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी करावी, त्यावर कार्पेट करावे, ही आमची मागणी आहे. व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील १० उपविभागात वीज ग्राहक मेळावे घेण्यात आले आहेत. त्यात समोर आलेल्या ग्राहकांच्या समस्यांचे संकलन आम्ही केले आहे.त्यातील बऱ्याच समस्या मार्गी लागत आहेत. तिन्ही वीज कंपनीनी वीज दर वाढबाबत मागणी केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी वीज ग्राहक संघटना आम्ही तयार केली आहे. वीज वितरण कंपनीच्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक  आणि सिंधुदुर्गमधील ग्राहक यांची तुलना केल्यास त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत.याबाबत सविस्तर चर्चा चालू आहे.त्याबाबतही लवकरच महत्वपूर्ण निर्णय होतील. असेही नितीन वाळके यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका