शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:51 IST

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देतिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारास्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी घेतला आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या तिलारीच्या पाण्यावर गोव्याची तहान भागविली जाते. मात्र, ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे आहे, त्या शिरंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या खानयाळे पुनर्वसन गावठणातील (बोडण) धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भीषण पाणीटंचाईला इथल्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी धरणग्रस्तांमधून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.परिणामी महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, बोडण सरपंच मनीषा नाईक, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, तालुका उपाध्यक्ष संतोष नाईक, एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती मनीषा देवी आदी उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांना नानचे यांनी राज्य सरकारने पाणीटंचाईच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून, तालुका पातळीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. तर धरणग्रस्तांना शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.छायाचित्रास प्रतिबंधयावेळी तहसीलदार यांना शिरंगे धरणग्रस्त व बोडण ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासंबंधित मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, त्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिबंध केला. आचारसंहितेचे कारण यावेळी त्यांनी पुढे केले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग