शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:51 IST

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देतिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारास्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी घेतला आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या तिलारीच्या पाण्यावर गोव्याची तहान भागविली जाते. मात्र, ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे आहे, त्या शिरंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या खानयाळे पुनर्वसन गावठणातील (बोडण) धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भीषण पाणीटंचाईला इथल्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी धरणग्रस्तांमधून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.परिणामी महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, बोडण सरपंच मनीषा नाईक, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, तालुका उपाध्यक्ष संतोष नाईक, एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती मनीषा देवी आदी उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांना नानचे यांनी राज्य सरकारने पाणीटंचाईच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून, तालुका पातळीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. तर धरणग्रस्तांना शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.छायाचित्रास प्रतिबंधयावेळी तहसीलदार यांना शिरंगे धरणग्रस्त व बोडण ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासंबंधित मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, त्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिबंध केला. आचारसंहितेचे कारण यावेळी त्यांनी पुढे केले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग