शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:51 IST

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.

ठळक मुद्देतिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारास्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी घेतला आक्रमक पवित्रा

दोडामार्ग : संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी केला.दोडामार्ग तालुक्यात महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी धरण साकारले आहे. या तिलारीच्या पाण्यावर गोव्याची तहान भागविली जाते. मात्र, ज्यांच्या त्यागावर हे धरण उभे आहे, त्या शिरंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या खानयाळे पुनर्वसन गावठणातील (बोडण) धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. भीषण पाणीटंचाईला इथल्या ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी धरणग्रस्तांमधून केली जात होती. मात्र प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.परिणामी महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, बोडण सरपंच मनीषा नाईक, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, तालुका उपाध्यक्ष संतोष नाईक, एकनाथ नाडकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती मनीषा देवी आदी उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांना नानचे यांनी राज्य सरकारने पाणीटंचाईच्या कामाला मुदतवाढ मिळाली असून, तालुका पातळीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. तर धरणग्रस्तांना शासनाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्यास तिलारी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.छायाचित्रास प्रतिबंधयावेळी तहसीलदार यांना शिरंगे धरणग्रस्त व बोडण ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासंबंधित मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, त्याचे छायाचित्र घेण्यास पत्रकारांना तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिबंध केला. आचारसंहितेचे कारण यावेळी त्यांनी पुढे केले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग