शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

By admin | Updated: December 25, 2016 23:35 IST

अन्य दोघेजण किरकोळ जखमी

दोडामार्ग : वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या तिलारी (रामघाट) घाटात बेळगाव ते दोडामार्ग अशी भाजी वाहतूक करणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोडामार्ग येथील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर (४५, मूळ रा. कुद्रेमणी, जि. बेळगाव) हा गाडीखाली चिरडून जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला.गेल्या काही वर्षांत रस्त्याच्या डागडुजीकडे झालेले दुर्लक्ष आणि अवजड वाहतुकीचे वाढते प्रमाण आदीमुळे हा रामघाट वाहतुकीस धोकादायकच बनला आहे. असे असले तरी खडी वाहतूक करणारे डंपर, भाजी व्यावसायिक, ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे टेम्पो याच घाटातून खाली कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे पसंत करतात.रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने दोडामार्ग बाजारपेठेतील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर हा भाड्याचा टेम्पो (एम एच ०४ - डीएस ३४८) घेऊन बेळगाव येथे गेला होता. शनिवारी मध्यरात्री ते दोडामार्गकडे येण्यास निघाले. यावेळी गाडीत चालक कल्लाप्पा रामकृष्ण पाऊसकर, वैजनाथ गोपाळ तलवार (रा. कुंद्रे्रमणी, बेळगाव) व दुर्गाप्रसाद वडर असे तिघेजण होते. पहाटे हा टेम्पो तिलारी घाटातील मोठ्या उतारावर आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे भीतीने क्लिनरच्या बाजूला असलेल्या दुर्गाप्रसादने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली. याच दरम्यान टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो उलटला. टेम्पोच्या खाली दुर्गाप्रसाद चिरडला गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती चंदगड पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)रामघाट धोकादायक!दोडामार्ग आणि नजीकच्या गोवा राज्यात येणारी भाजी प्रामुख्याने बेळगाव (कर्नाटक) येथून आणली जाते. त्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता म्हणून तिलारी अर्थात रामघाटाचा उपयोग केला जातो. मात्र, नागमोडी वळणे आणि अतितीव्र उतार तसेच अवजड वाहतुकीमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था आदी कारणांमुळे घाटातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. असे असले तरी वाहनचालक जीवावर उदार होऊन वाहतूक करण्याचा धोका पत्करतात. मूळात या घाटाला उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओची परवानगी नाही. त्यांच्या मते हा घाट वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने हा घाट आपल्याकडे हस्तांतरित केलेला नाही. परिणामत: सध्या या घाटाची मालकी पाटबंधारे विभागाकडेच आहे. तिलारी प्रकल्पाची यंत्रसामग्री आणण्यासाठी या घाटाची निर्मिती पाटबंधारे विभागाने केल्याने त्यांच्याच ताब्यात तो असून, अधूनमधून त्यांच्याकडूनच घाटाची दुरुस्ती होते.