शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

तिलारी रामघाटात टेम्पो उलटून व्यावसायिक ठार

By admin | Updated: December 25, 2016 23:35 IST

अन्य दोघेजण किरकोळ जखमी

दोडामार्ग : वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या तिलारी (रामघाट) घाटात बेळगाव ते दोडामार्ग अशी भाजी वाहतूक करणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोडामार्ग येथील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर (४५, मूळ रा. कुद्रेमणी, जि. बेळगाव) हा गाडीखाली चिरडून जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडला.गेल्या काही वर्षांत रस्त्याच्या डागडुजीकडे झालेले दुर्लक्ष आणि अवजड वाहतुकीचे वाढते प्रमाण आदीमुळे हा रामघाट वाहतुकीस धोकादायकच बनला आहे. असे असले तरी खडी वाहतूक करणारे डंपर, भाजी व्यावसायिक, ब्रॉयलर कोंबड्यांची वाहतूक करणारे टेम्पो याच घाटातून खाली कोकणात आणि पुढे गोव्यात जाणे पसंत करतात.रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने दोडामार्ग बाजारपेठेतील भाजी व्यावसायिक दुर्गाप्रसाद भिमाप्पा वडर हा भाड्याचा टेम्पो (एम एच ०४ - डीएस ३४८) घेऊन बेळगाव येथे गेला होता. शनिवारी मध्यरात्री ते दोडामार्गकडे येण्यास निघाले. यावेळी गाडीत चालक कल्लाप्पा रामकृष्ण पाऊसकर, वैजनाथ गोपाळ तलवार (रा. कुंद्रे्रमणी, बेळगाव) व दुर्गाप्रसाद वडर असे तिघेजण होते. पहाटे हा टेम्पो तिलारी घाटातील मोठ्या उतारावर आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे भीतीने क्लिनरच्या बाजूला असलेल्या दुर्गाप्रसादने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली. याच दरम्यान टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो उलटला. टेम्पोच्या खाली दुर्गाप्रसाद चिरडला गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती चंदगड पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अधिक तपास चंदगड पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)रामघाट धोकादायक!दोडामार्ग आणि नजीकच्या गोवा राज्यात येणारी भाजी प्रामुख्याने बेळगाव (कर्नाटक) येथून आणली जाते. त्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता म्हणून तिलारी अर्थात रामघाटाचा उपयोग केला जातो. मात्र, नागमोडी वळणे आणि अतितीव्र उतार तसेच अवजड वाहतुकीमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था आदी कारणांमुळे घाटातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. असे असले तरी वाहनचालक जीवावर उदार होऊन वाहतूक करण्याचा धोका पत्करतात. मूळात या घाटाला उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओची परवानगी नाही. त्यांच्या मते हा घाट वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने हा घाट आपल्याकडे हस्तांतरित केलेला नाही. परिणामत: सध्या या घाटाची मालकी पाटबंधारे विभागाकडेच आहे. तिलारी प्रकल्पाची यंत्रसामग्री आणण्यासाठी या घाटाची निर्मिती पाटबंधारे विभागाने केल्याने त्यांच्याच ताब्यात तो असून, अधूनमधून त्यांच्याकडूनच घाटाची दुरुस्ती होते.