शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:23 IST

त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत किती वाघांचा संचार आहे, हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून शनिवारपासून व्याघ्र गणना करण्याचे काम सुरू करण्यात आली असून ही गणना २१ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी कॅमेरे ही लावण्यात आले होते, त्यात वाघाचे अस्तित्व आढळून आले होते. त्यामुळे या ठिकाणी वाघ आहे हे निश्चित झाले होते. मात्र व्याघ्र गणनामुळे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.आजपासून सुरू होणाऱ्या व्याघ्र गणनेच्या माध्यमातून आता वाघाचे अस्तित्व समोर येणार आहे. यासाठी एकूण पाच जिल्ह्यात ही गणना केली जाणार असून कोेल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी ही गणना केली जाणार आहे.मागच्या काळात सिंधुदुर्गमधील वाघ हे गोवा व कर्नाटक हद्दीत गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्व कमी दिसून आले होते. मात्र हे वाघ सर्वत्र फिरत असतात. वाघ एका दिवसात २५ किलोमीटरचे अंतर पार करतो. त्यामुळे व्याघ्र गणना वेळेस त्याचे अस्तित्व कुठे असेल ते अहवालानंतर स्पष्ट होणार आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ