शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:23 IST

त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत किती वाघांचा संचार आहे, हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून शनिवारपासून व्याघ्र गणना करण्याचे काम सुरू करण्यात आली असून ही गणना २१ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी कॅमेरे ही लावण्यात आले होते, त्यात वाघाचे अस्तित्व आढळून आले होते. त्यामुळे या ठिकाणी वाघ आहे हे निश्चित झाले होते. मात्र व्याघ्र गणनामुळे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.आजपासून सुरू होणाऱ्या व्याघ्र गणनेच्या माध्यमातून आता वाघाचे अस्तित्व समोर येणार आहे. यासाठी एकूण पाच जिल्ह्यात ही गणना केली जाणार असून कोेल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा ठिकाणी ही गणना केली जाणार आहे.मागच्या काळात सिंधुदुर्गमधील वाघ हे गोवा व कर्नाटक हद्दीत गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्व कमी दिसून आले होते. मात्र हे वाघ सर्वत्र फिरत असतात. वाघ एका दिवसात २५ किलोमीटरचे अंतर पार करतो. त्यामुळे व्याघ्र गणना वेळेस त्याचे अस्तित्व कुठे असेल ते अहवालानंतर स्पष्ट होणार आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ