शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तीन अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

उर्जामंत्र्यांकडून शॉक : कामात हलगर्जीपणाचा ठपका, सर्वांचीच घेतली झाडाझडती

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची स्थिती बिकट आहे. वीज वितरणच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीच्या काही अभियंत्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच झाडाझडती घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखत जोराचा ‘शॉक’ दिला. जिल्हाधिकारी भवनातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील विजेच्या संबंधी चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित असल्यामुळे सभागृहात उभे रहायलाही वाव नव्हता. सुमारे दहा वर्षानंतर पहिल्यांदा विस्तृत असा विजेच्या समस्यांविषयी आढावा घेण्यात आला. वीज वितरणच्या सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उर्जामंत्री बावनकुळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सर्वांना रांगेत उभे करून प्रलंबित कामांची चौकशी केली. अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणात संशय वाटल्यास उर्जामंत्री बावनकुळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला, सचिवांना भ्रमणध्वनीमार्फत फोन करून ‘त्या’ कामासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. एखाद्या कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा आढळल्यास प्रसंगी निलंबित किंवा सेवा समाप्तीही करू, अशी तंबी मंत्री बावनकुळे यांनी दिल्याने अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. कधी नव्हे ते जिल्ह्यातील वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी ड्रेसकोडमध्ये दिसत होते. तसेच जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात अनियमितता व हलगर्जीपणा केल्यामुळे ‘त्या’ तिघाही अधिकाऱ्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखा, असे आदेशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून दिले. या जिल्ह्यात ग्राहकांकडून थकबाकी कमी प्रमाणात आहे तरीसुद्धा जनतेला चांगल्याप्रकारे सेवा मिळत नाहीत. महावितरण, महापारेषण जनतेला चांगल्या सेवा देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात २ हजार मेगावॅट वीजसाठा उपलब्ध आहे. वीजेची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. मात्र हा वीजपुरवठा वितरीत करण्यासाठी मजबूत प्रकारे जाळे उपलब्ध नसल्याने कित्येक ग्राहकांना वीज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचीही कित्येक कृषी पंपांना वीज जोडणी देणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. या आत्महत्यांना वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री बावनकुळे यांनी केला.