शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तीन अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

उर्जामंत्र्यांकडून शॉक : कामात हलगर्जीपणाचा ठपका, सर्वांचीच घेतली झाडाझडती

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची स्थिती बिकट आहे. वीज वितरणच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीच्या काही अभियंत्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच झाडाझडती घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखत जोराचा ‘शॉक’ दिला. जिल्हाधिकारी भवनातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील विजेच्या संबंधी चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित असल्यामुळे सभागृहात उभे रहायलाही वाव नव्हता. सुमारे दहा वर्षानंतर पहिल्यांदा विस्तृत असा विजेच्या समस्यांविषयी आढावा घेण्यात आला. वीज वितरणच्या सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच उर्जामंत्री बावनकुळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सर्वांना रांगेत उभे करून प्रलंबित कामांची चौकशी केली. अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणात संशय वाटल्यास उर्जामंत्री बावनकुळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला, सचिवांना भ्रमणध्वनीमार्फत फोन करून ‘त्या’ कामासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. एखाद्या कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा आढळल्यास प्रसंगी निलंबित किंवा सेवा समाप्तीही करू, अशी तंबी मंत्री बावनकुळे यांनी दिल्याने अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. कधी नव्हे ते जिल्ह्यातील वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी ड्रेसकोडमध्ये दिसत होते. तसेच जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात अनियमितता व हलगर्जीपणा केल्यामुळे ‘त्या’ तिघाही अधिकाऱ्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ रोखा, असे आदेशही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून दिले. या जिल्ह्यात ग्राहकांकडून थकबाकी कमी प्रमाणात आहे तरीसुद्धा जनतेला चांगल्याप्रकारे सेवा मिळत नाहीत. महावितरण, महापारेषण जनतेला चांगल्या सेवा देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात २ हजार मेगावॅट वीजसाठा उपलब्ध आहे. वीजेची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. मात्र हा वीजपुरवठा वितरीत करण्यासाठी मजबूत प्रकारे जाळे उपलब्ध नसल्याने कित्येक ग्राहकांना वीज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचीही कित्येक कृषी पंपांना वीज जोडणी देणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. या आत्महत्यांना वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री बावनकुळे यांनी केला.