शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उरलेत ते आमदार टिकावेत, म्हणूनच जयंत पाटील बोलतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 23:58 IST

वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

सावंतवाडी : अजित पवार गटातील कोणीही आमदार शरद पवार गटांच्या संर्पकात नाही. उलट आहेत ते आमदार टिकून राहिले पाहिजेत, यासाठीच शरद पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अशी वक्तव्ये करत आहेत. वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

सावंतवाडी विधानसभेच्या वॉर रूमचे उद्घाटन गुरूवारी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याच्या हस्ते पार पडले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात नशिबात असेल, त्याला तिकिट मिळेल असेही यावेळी बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत 22 जागांची मागणी केली आहे. लोकशाहीत कोणीही मागणी करू शकतात, पण या सर्वांचा निर्णय भाजपचे केंद्रीय निवड मंडळ घेणार आहे, असे सांगत तिकिट वाटप सर्वांना विश्वासात घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार असे विचारले असता ज्यांच्या नशिबात असेल त्याला उमेदवारी मिळेल असे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटांचे काही आमदार आमच्या संर्पकात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बावनकुळे यांनी ही भाषा फक्त आहेत ते आमदार टिकून राहिले पाहिजेत यासाठीच आहे. मात्र वेळ आल्यानंतर सर्वकाही कळेल असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे