शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:50 IST

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली.

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली. किना-यावर ओढण्यात येणारी मासळी गोळा करण्याचे काम दुस-या दिवशी म्हणजेच सोमवारीही सुरूच होते. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या परिसरात सापडलेली मासळी गोळा करून मच्छीमार हैराण झाले तर रात्रभर मासळी गोळा करून मच्छीमार दमल्याने परप्रांतातील कामगारांना मासळी गोळा करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. तोडणकर यांच्या रापणीस सुमारे तीनशेहून अधिक खंडी तारली मासळी मिळाली. या मासळीमुळे रापणकर संघास लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे.किनारपट्टी भागातील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांचे तसेच जाळ्यांचे ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झाले होते. वादळाच्या काळात मासेमारी बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र समुद्रातील वातावरण निवळल्यानंतर मच्छीमार नव्या जोमाने मासेमारीस उतरला. यात पहिल्याच टप्प्यात वायरी येथील नारायण तोडणकर यांच्या रापणीस रविवारी तारली मासळीचा बंपर मिळाला.रात्रभर मासळी ओढून ती वाहनांमधून पाठविण्यासाठी प्रथमच जेसीबीचा वापर करण्याची वेळ मच्छीमारांवर आली. उर्वरीत मासळी गोळा करण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी परिस्थिती आहे. नारायण तोडणकर रापण संघाच्या जाळ्या पाठोपाठ मेस्त रापणकर संघाची रापण असून ती ओढायची बाकी आहे. मात्र तोडणकर यांच्या रापणीस मिळालेली मासळी गोळा करण्यास आणखीन एक लागणार आहे. त्यानंतर मेस्त यांची रापण ओढण्यात येणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.दुर्गंधीचे साम्राज्यमच्छीमारांच्या जाळीत अनपेक्षित तारली मासळी मिळाली. ही मासळी निर्यात केली जात असून, मासळी वाहतूक करणा-या वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली जात आहे. किनारपट्टीवर तारली मासळीचा खच असल्याने खराब झालेल्या मासळीला प्रचंड दुर्गंधी येत आहे. तर मालवण- कसाल व मालवण वेंगुर्ले तसेच मावळण-कुडाळ या मार्गावर मासळी वाहतूक होणा-या वाहनांतून मासळीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अजूनही काही दिवस दुर्गंधी रस्त्यावरील नागरिकांना सहन करावा लागणर आहे.