शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:50 IST

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली.

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली. किना-यावर ओढण्यात येणारी मासळी गोळा करण्याचे काम दुस-या दिवशी म्हणजेच सोमवारीही सुरूच होते. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या परिसरात सापडलेली मासळी गोळा करून मच्छीमार हैराण झाले तर रात्रभर मासळी गोळा करून मच्छीमार दमल्याने परप्रांतातील कामगारांना मासळी गोळा करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. तोडणकर यांच्या रापणीस सुमारे तीनशेहून अधिक खंडी तारली मासळी मिळाली. या मासळीमुळे रापणकर संघास लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे.किनारपट्टी भागातील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांचे तसेच जाळ्यांचे ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झाले होते. वादळाच्या काळात मासेमारी बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र समुद्रातील वातावरण निवळल्यानंतर मच्छीमार नव्या जोमाने मासेमारीस उतरला. यात पहिल्याच टप्प्यात वायरी येथील नारायण तोडणकर यांच्या रापणीस रविवारी तारली मासळीचा बंपर मिळाला.रात्रभर मासळी ओढून ती वाहनांमधून पाठविण्यासाठी प्रथमच जेसीबीचा वापर करण्याची वेळ मच्छीमारांवर आली. उर्वरीत मासळी गोळा करण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी परिस्थिती आहे. नारायण तोडणकर रापण संघाच्या जाळ्या पाठोपाठ मेस्त रापणकर संघाची रापण असून ती ओढायची बाकी आहे. मात्र तोडणकर यांच्या रापणीस मिळालेली मासळी गोळा करण्यास आणखीन एक लागणार आहे. त्यानंतर मेस्त यांची रापण ओढण्यात येणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.दुर्गंधीचे साम्राज्यमच्छीमारांच्या जाळीत अनपेक्षित तारली मासळी मिळाली. ही मासळी निर्यात केली जात असून, मासळी वाहतूक करणा-या वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली जात आहे. किनारपट्टीवर तारली मासळीचा खच असल्याने खराब झालेल्या मासळीला प्रचंड दुर्गंधी येत आहे. तर मालवण- कसाल व मालवण वेंगुर्ले तसेच मावळण-कुडाळ या मार्गावर मासळी वाहतूक होणा-या वाहनांतून मासळीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अजूनही काही दिवस दुर्गंधी रस्त्यावरील नागरिकांना सहन करावा लागणर आहे.