शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

बंद घराची कौले काढून चोरांनी कपाट फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:42 IST

मालवण शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणाऱ्या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आतील कपाट फोडून रोख ३१ हजार ५०० रुपये, सोन्याची साखळी व अंगठी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून तीन संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबंद घराची कौले काढून चोरांनी कपाट फोडले मालवणातील घटना : रोख रक्कम लंपास

मालवण : शहरातील पोस्ट कार्यालयानजीक राहणाऱ्या प्रसाद श्रीकांत सावंत यांच्या बंद घराची कौले काढून आतील कपाट फोडून रोख ३१ हजार ५०० रुपये, सोन्याची साखळी व अंगठी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना २४ नोव्हेंबरला घडली. याबाबतची तक्रार सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून तीन संशयितांची नावे दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.मालवण पोस्ट कार्यालयानजीक राहणारे प्रसाद सावंत हे न्यायालयाच्या कामानिमित्त २३ रोजी मुंबई येथे गेले होते. ते माघारी परतल्यानंतर त्यांनी घराचे कुलूप उघडले असता अज्ञातांनी घराची कौले काढून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता दगडाने कपाट फोडून आतील लक्ष्मीपूजनाची गेली पंधरा वर्षे साठविलेली ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम, १८ ग्रॅमची सोन्याची साखळी, साडेसहा ग्रॅमची सोन्याची अंगठी तसेच अन्य कागदपत्रे चोरीस गेल्याचे दिसून आले.त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत चोरीची तक्रार दिली आहे. यात त्यांनी तीन जणांवर चोरीचा संशय व्यक्त केला असून त्यांची नावेही पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.रेल्वे प्रवाशाचा मृत्यूकणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती एक्स्प्रेसमधून केरळच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कणकवली रेल्वेस्थानकात गाडी थांबवून त्या प्रवाशाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो प्रवासी मृत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.नेत्रावती एक्स्प्रेसमधून रमण शंकरण कुट्टी (६४, रा. सांताक्रुझ, मुंबई) हे गुरुवारी प्रवास करीत होते. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तसेच त्यांच्या तोंडामधून फेसही आल्यामुळे सोबतच्या प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्याला त्याची माहिती दिली. त्यांनी कणकवली स्टेशनमास्तरांना कळविले. तसेच रेल्वे सुरक्षा बलाला त्याची माहिती देण्यात आली.कणकवली येथे ती रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान राजेश कांदळगावकर यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने त्या प्रवाशाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच तो प्रवासी मृत झाल्याचे तेथील डॉक्टरनी सांगितले. या घटनेबाबत कणकवली पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी त्या प्रवाशाच्या भावाशी संपर्क करून माहिती दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग