शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

त्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:08 IST

काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देत्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखलबंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ

दोडामार्ग : काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आपल्यासह इतर १९ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे (रा. पिसुलै, फोंडा गोवा) या बंटी-बबलीच्या जोडीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू बागायतदार आहेत. गेल्या दहा वर्षांत भातशेतीसोबतच तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे काजू लागवडीखाली आले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचे बहुतांशी अर्थकारण हे काजूवर अवलंबून आहे. त्यातच मागील चार वर्षांत काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकरी फायद्यात होते. मात्र, हाच दर चालू वर्षी गडगडला.

गेल्या वर्षाच्या तुलनेत काजूबीचा प्रति किलोमागे दर यावर्षी ४० रुपयांनी कमी होता. बहुतांशी ठिकाणी चालू हंगामात १३० रुपये किलो या दराने काजू खरेदी केली. मात्र, इतर कारखानदारांपेक्षा चढ्या दराने काजू बी खरेदी करण्याचे आमिष गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकºयांना दाखविले. तालुक्यातील काजू बागायतदारांनी या आमिषाला बळी पडून आपली काजूबी त्यांना दिली.काजू बी खरेदी करताना दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे यांनी प्रथम शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांना पैसेही व्यवस्थित दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून काजूबी विक्री केली.झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी आपल्याकडील २० लाख २१ हजार ९१५ रुपयांची काजू बी विक्री केली. त्यापैकी त्यांना ८ लाख २५ हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले. तर उर्वरित ११ लाख ९६ हजार ९१५ रुपये शिल्लक राहिले. मात्र त्यानंतर संबंधित काजूबी खरेदी करणाऱ्या बंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ झाला. त्यांनी आपला पत्ता दिला होता त्याठिकाणी ते दोघे वास्तव्यास नसल्याचे समोर आले आले.गंडा घातल्याप्रकरणी तक्रार दाखललक्ष्मण मोरजकर यांनी अखेर बुधवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मोरजकर यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांची ११ लाख २४ हजार ८५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गोव्यातील बंटी-बबलीच्या या जोडीविरुद्ध शेतकºयांना २३ लाख २१ हजार ७६८ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा पाटील करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग