शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

त्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:08 IST

काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देत्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखलबंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ

दोडामार्ग : काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आपल्यासह इतर १९ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे (रा. पिसुलै, फोंडा गोवा) या बंटी-बबलीच्या जोडीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू बागायतदार आहेत. गेल्या दहा वर्षांत भातशेतीसोबतच तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे काजू लागवडीखाली आले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचे बहुतांशी अर्थकारण हे काजूवर अवलंबून आहे. त्यातच मागील चार वर्षांत काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकरी फायद्यात होते. मात्र, हाच दर चालू वर्षी गडगडला.

गेल्या वर्षाच्या तुलनेत काजूबीचा प्रति किलोमागे दर यावर्षी ४० रुपयांनी कमी होता. बहुतांशी ठिकाणी चालू हंगामात १३० रुपये किलो या दराने काजू खरेदी केली. मात्र, इतर कारखानदारांपेक्षा चढ्या दराने काजू बी खरेदी करण्याचे आमिष गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकºयांना दाखविले. तालुक्यातील काजू बागायतदारांनी या आमिषाला बळी पडून आपली काजूबी त्यांना दिली.काजू बी खरेदी करताना दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे यांनी प्रथम शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांना पैसेही व्यवस्थित दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून काजूबी विक्री केली.झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी आपल्याकडील २० लाख २१ हजार ९१५ रुपयांची काजू बी विक्री केली. त्यापैकी त्यांना ८ लाख २५ हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले. तर उर्वरित ११ लाख ९६ हजार ९१५ रुपये शिल्लक राहिले. मात्र त्यानंतर संबंधित काजूबी खरेदी करणाऱ्या बंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ झाला. त्यांनी आपला पत्ता दिला होता त्याठिकाणी ते दोघे वास्तव्यास नसल्याचे समोर आले आले.गंडा घातल्याप्रकरणी तक्रार दाखललक्ष्मण मोरजकर यांनी अखेर बुधवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मोरजकर यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांची ११ लाख २४ हजार ८५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गोव्यातील बंटी-बबलीच्या या जोडीविरुद्ध शेतकºयांना २३ लाख २१ हजार ७६८ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा पाटील करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग