शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

त्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:08 IST

काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देत्या दोघांवर पोलिसांनी केला फसवणुकीचा गुन्हा दाखलबंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ

दोडामार्ग : काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आपल्यासह इतर १९ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे (रा. पिसुलै, फोंडा गोवा) या बंटी-बबलीच्या जोडीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू बागायतदार आहेत. गेल्या दहा वर्षांत भातशेतीसोबतच तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे काजू लागवडीखाली आले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचे बहुतांशी अर्थकारण हे काजूवर अवलंबून आहे. त्यातच मागील चार वर्षांत काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकरी फायद्यात होते. मात्र, हाच दर चालू वर्षी गडगडला.

गेल्या वर्षाच्या तुलनेत काजूबीचा प्रति किलोमागे दर यावर्षी ४० रुपयांनी कमी होता. बहुतांशी ठिकाणी चालू हंगामात १३० रुपये किलो या दराने काजू खरेदी केली. मात्र, इतर कारखानदारांपेक्षा चढ्या दराने काजू बी खरेदी करण्याचे आमिष गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकºयांना दाखविले. तालुक्यातील काजू बागायतदारांनी या आमिषाला बळी पडून आपली काजूबी त्यांना दिली.काजू बी खरेदी करताना दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे यांनी प्रथम शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांना पैसेही व्यवस्थित दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून काजूबी विक्री केली.झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी आपल्याकडील २० लाख २१ हजार ९१५ रुपयांची काजू बी विक्री केली. त्यापैकी त्यांना ८ लाख २५ हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले. तर उर्वरित ११ लाख ९६ हजार ९१५ रुपये शिल्लक राहिले. मात्र त्यानंतर संबंधित काजूबी खरेदी करणाऱ्या बंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ झाला. त्यांनी आपला पत्ता दिला होता त्याठिकाणी ते दोघे वास्तव्यास नसल्याचे समोर आले आले.गंडा घातल्याप्रकरणी तक्रार दाखललक्ष्मण मोरजकर यांनी अखेर बुधवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मोरजकर यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांची ११ लाख २४ हजार ८५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गोव्यातील बंटी-बबलीच्या या जोडीविरुद्ध शेतकºयांना २३ लाख २१ हजार ७६८ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा पाटील करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीsindhudurgसिंधुदुर्ग