शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ मायदेशी परत येण्यासाठी...!

By admin | Updated: January 16, 2016 00:34 IST

कोकण किनारा

लोकमत रत्नागिरी आवृत्तीचा नववा वर्धापन दिन काल १५ जानेवारीला झाला. गेली आठ वर्षे ‘लोकमत’ने सतत वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार आणि संग्रही ठेवाव्यात, अशा विषयांवरील विशेषांक तुम्हा वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आणि प्रत्येकवेळी तुमच्याकडून त्याला भरभरून दाद मिळाली. तुमच्याशी जोडलं गेलेलं हे नातं असंच टिकून राहावं, यासाठी याहीवेळी रत्नागिरीच्या मातीशी जोडला गेलेला विषय ‘लोकमत’ने निवडला, ग्लोबल कोकणी! नोकरी, व्यवसायानिमित्त सातासमुद्राची हद्द ओलांडून गेलेल्या आणि परक्या मातीत स्थिरावलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सुपुत्रांच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सुकन्यांच्या यशाच्या स्टोरीज्! झाड कितीही उंच गेलं तर त्याची मुळं जमिनीतच असतात, मुळांचं जवळचं नातं मातीशीच असतं. त्यानुसार परदेशात नोकरी करणाऱ्या, व्यवसाय उभे केलेल्या अनेकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यातून ग्लोबल कोकणी विशेषांकाला अधिक व्यापकता देता आली. ११ जानेवारीपासून प्रसिद्ध होत असलेल्या या विशेषांकाचे तुम्ही सर्वांनीच अतिशय मनापासून स्वागत केल्याच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवणाऱ्या होत्या. पण हा विषय केवळ कौतुकाच्या कथा आहेत का? त्या कौतुकाच्या कथा आहेतच, पण त्यातून अव्यक्तपणे व्यक्त होणारे अनेक विषय विचार करायला लावणारे आहेत. गंभीर करणारे आहेत.‘ग्लोबल कोकणी’ हा विषय म्हणजे परदेशातल्या आपल्या बांधवांच्या यशाच्या कथा आहेत. पण आज ते किती यशस्वी आहेत, याचा विचार करताना हे यश मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, याचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळेच या केवळ यशाच्या कथा नाहीत. त्या परिश्रमांच्या कथा आहेत, त्या मेहनतीच्या कथा आहेत, त्या बुद्धीमत्तेच्या कथा आहेत. गेले दोन-पाच वर्षात परदेशात जाणाऱ्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. त्यांच्या दिमतीला इंटरनेटचा मोठा आधार होता. (तरीही त्यांचे काम कौतुकास्पद आहेच.) पण त्याहीपेक्षा महत्त्वाची नोंद घेणे गरजेची आहे ती आधी परदेशात गेलेल्यांची. मराठी माध्यमाच्या, त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्यांनी परदेशी झेप घेतली तेव्हा दळणवळणामध्ये इतकी सुलभता नव्हती. तिकडे पोहोचल्यानंतर घरच्यांशी पत्रातूनच संपर्क व्हायचा. तेव्हा व्हॉटस्अ‍ॅप नव्हतं आणि मोबाईल सुरू झाल्यानंतरही परदेशात मोबाईलवर संपर्क साधण्याइतकीही स्थिती नव्हती. पण त्याही काळात अतिशय नेटाने अनेकजण परदेशांमध्ये स्थिरावले. ही बाब कौतुकास्पद अशीच आहे.आताच्या काळात दळणवळण सोपे झाले आहे. संपर्काची खूप साधने आहेत. व्हिडीओ कॉल ही आता अवघड आणि महागडी वाटणारी गोष्ट नाही. परदेशांमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण तरीही त्या-त्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी तुमच्याकडे विशेष क्षमतेचीच गरज आहे. ती असल्यामुळेच आजच्या घडीला तरूण पिढीतील अनेकजण परदेशांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांची झेपही कौतुकास्पद आहे.खरे तर माणूस हा समाजप्रिय प्राणी. त्यातही आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये राहण्याची मानसिक गरज अधिक. पण तरीही आपल्या घरादारापासून, माणसांपासून लांब जाणारे पैशाच्या ओढीने परदेश गाठत असतील का? की परदेशातील चकाचक आयुष्य त्यांना आकर्षित करत असेल? आपण घेतलेल्या शिक्षणानुसार पैसे मिळावेत, ही अपेक्षा चुकीची नाही. चकाचक आयुष्याचं आकर्षणही अयोग्य नाही. पण जे परदेशात आहे, ते आपल्याकडे नाही, ही मुख्य खंत आहे. परदेशात नोकरी कोणाला मिळते? जे बुद्धीमान आहेत, त्यांना. म्हणजेच भारतातील अनेक बुद्धीमान लोक परदेशात काम करत आहेत. दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे कोणीही कोठेही जाऊन आपल्या उत्पन्नाची सोय करू शकतो. पण आपला देश सोडून इतर देशात जाण्याची वेळ का यावी? याचे एकमेव उत्तर म्हणजे सुविधांबाबत आपण खूप कमी आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत उद्योग क्षेत्राची वाढ झालेली नाही. जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात आहे आणि त्यादृष्टीने भारत महासत्ता आहे, हे वाक्य भाषणात टाळ्या घेण्यासाठी योग्य आहे. त्याची आकडेवारीही अतिशय सुंदर वाटते. पण या तरूणांच्या हाताला काम आहे का? त्यांनी घेतलेल्या शिक्षणानुसार, त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना काम आणि वेतन देण्याइतकी आपली क्षमता आहे का? परदेशात काम करणाऱ्या तरूणांना भारतातच तितक्या वेतनाची नोकरी उपलब्ध असेल तर ते आपला देश, आपली माती सोडून बाहेर जातीलच कशाला? त्यासाठी उद्योगांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कीर ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटले होते, आज आपण उद्योगांना विरोध करत आहोत. आणखी काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीतील तरूणांना नोकऱ्या नसतील, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे? आजच्या घडीला ही बाब प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे. केवळ आपला भागच नाही तर देशभरात उद्योग वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे आणि ते आपल्या देशातच तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योग वाढणे, ही मोठी गरज आहे. नाहीतर परदेशी जाणाऱ्या आपल्या तरूणांची संख्या अजून वाढेल.आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्वच्छतेचा. परदेशांमधील स्वच्छतेचे भरपूर कौतुक होते. पण ही गोष्ट आपल्याला अशक्य आहे का? काही सामाजिक बंधने प्रत्येकाने पाळली तर अस्वच्छतेचे भूत पळवायला कुठलाही मांत्रिक लागणार नाही. सार्वजनिक स्वच्छता हा मोठा चिंतेचा विषय आहे. केवळ सरकारी मोहिमा राबवून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारी मोहिमांनी सुरूवात तर करून दिली आहे. आता पुढची जबाबदारी आपली आहे. परदेशांप्रमाणे आपला देश का स्वच्छ दिसू नये, असा विचार करायला हरकत नाही.परदेशातल्या आपल्या बहुसंख्य बांधवांनी ‘वर्क कल्चर’ या शब्दाचा उपयोग केला. परदेशात कामाच्यावेळी पूर्णपणे काम आणि मजेच्यावेळी पूर्णपणे मजा अशी पद्धत असल्याचे आवर्जून सांगितले. आपल्याकडे कामाच्यावेळी मजा आणि मजेच्यावेळी काम करण्याची पद्धत आहे. परदेश म्हणजे काही जादूची भूमी नाही. तेथेही आपल्यासारखी माणसेच आहेत. पण लोकसंख्या मर्यादीत असल्याने तेथे सरकारी यंत्रणेकडून अनेक सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्या जातात. त्या लोकांपर्यंत पोहोचतात. लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या आपल्या देशात सरकारी सुविधा खूप आहेत. पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्यालाही संधी आहे, स्मार्ट होण्याची. पण त्यासाठी आपली तयारी हवी.मनोज मुळ््ये