शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:12 IST

रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ठळक मुद्देजेथे जागा मिळेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल : सुभाष देसाई आडाळी एमआयडीसीमध्ये गोव्यातील उद्योग येणार

कणकवली : रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही.स्थानिकांना तो नको असल्याने नाणार येथून तो हटवला आहे.महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथील स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्‍चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल.तसेच आडाळी येथे पुढील कालावधीत गोव्यातील उद्योग येणार आहेत.त्याबाबत जागेचीही निश्‍चिती झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.येथील विजय भवन येथे शिवसेना पदाधिकार्‍यांनी महत्वाची बैठक झाली.यानंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.देसाई म्हणाले,नाणार परिसरातील नागरिकांना नाणार प्रकल्प नको असल्याने तो रद्द केला.सध्या तेथे प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत हमीपत्रे लिहून घेतली जात आहेत.पण प्रकल्पच रद्द झाल्याने या हमीपत्रांचा उपयोग नाही.आम्ही रिफायनरी प्रकल्पा विरोधात नाही जर महाराष्ट्रात जेथे जागा उपलब्ध होईल तेथे हा प्रकल्प होण्यास आमची कोणतीही हरकत नसेल.आडाळी येथे उद्योग येण्याबाबत आम्ही नुकतीच गोव्यातील उद्योजकांची भेट घेतली.गोव्यात उद्योग उभारण्यासाठी जागाच उपलब्ध नाही त्यामुळे तेथील उद्योजक आडाळी येथे येणार आहेत.या उद्योजकांना लागणार्‍या जागेचीही निश्‍चिती आडाळी येथे करण्यात आली असल्याचे देसाई म्हणाले.सिंधुदुर्ग रत्नागिरी भाजप व इतर काही युतीमधील पक्ष नाराज असले तरी त्यांची समजूत काढण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसांत शिवसेनेसोबत भाजप,आरपीआय आदींचेही झेंडे आणि पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रीय झालेले दिसतील असेही .देसाई म्हणाले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पSubhash Desaiसुभाष देसाईsindhudurgसिंधुदुर्ग