शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:44 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिवहन महामंडळातर्फे खास नियोजन रत्नागिरी विभागाकडून प्रवाशांसाठी ९५ जादा गाड्या

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी  दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.२९ आॅगस्ट रोजी ५२, ३० रोजी ३७४, ३१ रोजी १४८५, तर १ सप्टेंबर रोजी २७९ जादा गाड्या मुंबईतून सुटणार आहेत.सर्वाधिक गाड्या ३१ रोजी सुटणार आहेत. रत्नागिरी विभागाकडून प्रवाशांसाठी ९५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत मुंबई मार्गावर या गाड्या धावणार आहेत.गणेशोत्सवासाठी कशेडी, चिपळूण शिवाजीनगर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, चिपळुणात क्रेन उपलब्ध ठेवली जाणार आहे. अद्ययावत तीन दुरूस्ती व्हॅन खेड, चिपळूण, रत्नागिरी, ते राजापूर मार्गावर २४ तास तैनात राहणार आहे. याशिवाय महामार्गावरील प्रत्येक आगाराच्या कार्यशाळेत कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. रत्नागिरीत कंट्रोल रूम कार्यान्वित असणार आहे. याशिवाय कशेडी ते खारेपाटणपर्यंत दोन गस्तीपथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.याशिवाय प्रत्येक आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, शालेय फेऱ्यादेखील सुटीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रेल्वेस्थानकांतूनही प्रवाशांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती, प्रभारी वाहतूक नियंत्रक बोगरे यांनी दिली.नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा गाड्यायावर्षी मुंबई उपनगरातून कोकणात गणेशोत्सवासाठी नियमित बसेस व्यतिरिक्त कोकणात २२०० जादा गाड्या सोडण्यात येणार असल्या तरीनियमित गाड्यांबरोबर परतीच्या प्रवासासाठी १२७१ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ग्रुप बुकिंगच्या १२३ गाड्या आहेत. ३४१ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ८ सप्टेंबर रोजी ४८७, ९ रोजी ३१०, १० रोजी १९५, ११ रोजी ६५, १२ रोजी ५९, ७ रोजी १५५ गाड्या धावणार आहेत. गतवर्षी १३६६ गाड्या मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग