शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:49 IST

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढकणकवलीतील स्थिती : ठेकेदार कंपनीचे दुर्लक्षच, कामाचा दर्जा निकृष्ट

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

बॉक्सेल तसेच उड्डाणपुलाच्या कामाची स्थितीही तशीच असून ठेकेदार कंपनीकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर महामार्गाच्या या कामाचा निकृष्ट दर्जा विविध घटनांमुळे दिसून आला आहे. शहरातील नाल्यांची कामे व्यवस्थित करण्यात न आल्याने अलीकडेच रामेश्वर प्लाझा संकुलात पाणी साचले होते.

लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काही समस्या निदर्शनास आणल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र, ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकणार नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले असून त्याची हद्द निश्चित करण्याच्या सूचनांसोबतच धोकादायक अर्धवट ठेवलेल्या इमारतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही जूनमध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनास तसेच ठेकेदार कंपनीस पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबतही अजून ठोस काही झालेले नाही.

लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांकडून प्रत्येक बैठकीत अथवा पाहणी दौऱ्यात केवळ इशारे दिले जातात. मात्र, समस्या कायमस्वरूपी सुटली आहे, असे काही झालेले दिसून येत नाही. त्यामध्ये उड्डाणपुलाला जोडणाºया बॉक्सेलच्या भिंतीच्या समस्येसोबतच सर्व्हिस रस्त्यावर येणारे पाणी, परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी होणारा चिखल, नाले, गटारांच्या समस्या, खड्डे बुजविणे, शहरातील ४५ मीटरची हद्द निश्चित करणे, अर्धवट व धोकादायक इमारती पाडणे आदींबाबत चर्चा झाली होती.

त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. मात्र, किरकोळ मलमपट्टी वगळता ठोस असे काही झाले नाही.वाहने चालविणे कठीण : दुर्घटना घडण्याची शक्यताशहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्व्हिस रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्यावरून कसे चालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बसस्थानकाच्यासमोर तर सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणेही कठीण होत आहे. तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपासमोरही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणाºया संभाव्य अडचणींच्या अनुषंगाने महसूल प्रशासन व नगरपंचायतीकडूनही ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २३ जून रोजी प्रांताधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तातडीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला दिल्या. अर्धवट स्थितीतील धोकादायक इमारतींबाबतही अजून कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे प्रशासन व ठेकेदार कंपनी मोठी दुर्घटना घडण्याची वाट ही कामे करण्यासाठी पहात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या समस्येतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग