शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:49 IST

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढकणकवलीतील स्थिती : ठेकेदार कंपनीचे दुर्लक्षच, कामाचा दर्जा निकृष्ट

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

बॉक्सेल तसेच उड्डाणपुलाच्या कामाची स्थितीही तशीच असून ठेकेदार कंपनीकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर महामार्गाच्या या कामाचा निकृष्ट दर्जा विविध घटनांमुळे दिसून आला आहे. शहरातील नाल्यांची कामे व्यवस्थित करण्यात न आल्याने अलीकडेच रामेश्वर प्लाझा संकुलात पाणी साचले होते.

लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काही समस्या निदर्शनास आणल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र, ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकणार नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले असून त्याची हद्द निश्चित करण्याच्या सूचनांसोबतच धोकादायक अर्धवट ठेवलेल्या इमारतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही जूनमध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनास तसेच ठेकेदार कंपनीस पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबतही अजून ठोस काही झालेले नाही.

लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांकडून प्रत्येक बैठकीत अथवा पाहणी दौऱ्यात केवळ इशारे दिले जातात. मात्र, समस्या कायमस्वरूपी सुटली आहे, असे काही झालेले दिसून येत नाही. त्यामध्ये उड्डाणपुलाला जोडणाºया बॉक्सेलच्या भिंतीच्या समस्येसोबतच सर्व्हिस रस्त्यावर येणारे पाणी, परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी होणारा चिखल, नाले, गटारांच्या समस्या, खड्डे बुजविणे, शहरातील ४५ मीटरची हद्द निश्चित करणे, अर्धवट व धोकादायक इमारती पाडणे आदींबाबत चर्चा झाली होती.

त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. मात्र, किरकोळ मलमपट्टी वगळता ठोस असे काही झाले नाही.वाहने चालविणे कठीण : दुर्घटना घडण्याची शक्यताशहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्व्हिस रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्यावरून कसे चालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बसस्थानकाच्यासमोर तर सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणेही कठीण होत आहे. तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपासमोरही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणाºया संभाव्य अडचणींच्या अनुषंगाने महसूल प्रशासन व नगरपंचायतीकडूनही ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २३ जून रोजी प्रांताधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तातडीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला दिल्या. अर्धवट स्थितीतील धोकादायक इमारतींबाबतही अजून कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे प्रशासन व ठेकेदार कंपनी मोठी दुर्घटना घडण्याची वाट ही कामे करण्यासाठी पहात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या समस्येतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग