शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:49 IST

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरणांतर्गत समस्यांमध्ये होतेय वाढकणकवलीतील स्थिती : ठेकेदार कंपनीचे दुर्लक्षच, कामाचा दर्जा निकृष्ट

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेले सर्व्हिस रस्ते तसेच त्यालगतच्या गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब ऐन पावसाळ्यात समोर आली आहे.

बॉक्सेल तसेच उड्डाणपुलाच्या कामाची स्थितीही तशीच असून ठेकेदार कंपनीकडून त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत आहे. त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर महामार्गाच्या या कामाचा निकृष्ट दर्जा विविध घटनांमुळे दिसून आला आहे. शहरातील नाल्यांची कामे व्यवस्थित करण्यात न आल्याने अलीकडेच रामेश्वर प्लाझा संकुलात पाणी साचले होते.

लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काही समस्या निदर्शनास आणल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र, ही मलमपट्टी कायमस्वरूपी टिकणार नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले असून त्याची हद्द निश्चित करण्याच्या सूचनांसोबतच धोकादायक अर्धवट ठेवलेल्या इमारतीबाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही जूनमध्ये झालेल्या बैठकीत प्रशासनास तसेच ठेकेदार कंपनीस पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबतही अजून ठोस काही झालेले नाही.

लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांकडून प्रत्येक बैठकीत अथवा पाहणी दौऱ्यात केवळ इशारे दिले जातात. मात्र, समस्या कायमस्वरूपी सुटली आहे, असे काही झालेले दिसून येत नाही. त्यामध्ये उड्डाणपुलाला जोडणाºया बॉक्सेलच्या भिंतीच्या समस्येसोबतच सर्व्हिस रस्त्यावर येणारे पाणी, परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी होणारा चिखल, नाले, गटारांच्या समस्या, खड्डे बुजविणे, शहरातील ४५ मीटरची हद्द निश्चित करणे, अर्धवट व धोकादायक इमारती पाडणे आदींबाबत चर्चा झाली होती.

त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. मात्र, किरकोळ मलमपट्टी वगळता ठोस असे काही झाले नाही.वाहने चालविणे कठीण : दुर्घटना घडण्याची शक्यताशहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्व्हिस रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी त्यावरून कसे चालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील बसस्थानकाच्यासमोर तर सर्व्हिस रस्त्यावरून वाहने चालविणेही कठीण होत आहे. तेथून जवळच असलेल्या पेट्रोल पंपासमोरही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परिवर्तित मार्गाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणाºया संभाव्य अडचणींच्या अनुषंगाने महसूल प्रशासन व नगरपंचायतीकडूनही ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन वेळोवेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २३ जून रोजी प्रांताधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तातडीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीला दिल्या. अर्धवट स्थितीतील धोकादायक इमारतींबाबतही अजून कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे प्रशासन व ठेकेदार कंपनी मोठी दुर्घटना घडण्याची वाट ही कामे करण्यासाठी पहात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या समस्येतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग