शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: गाव पडलं ओस, शिराळेतील गावकरी गावकुसाबाहेर; नेमकं कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 12:50 IST

एरव्ही सुनसान असणाऱ्या ठिकाणी गलबलाट

प्रकाश काळेवैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : वैभववाडी तालुक्यातील शिराळेच्या वार्षिक ‘गावपळण’ला शुक्रवारी प्रारंभ झाला. गुराढोरांसह पाळीव प्राणी, पक्ष्यांना सोबत घेऊन गावकरी वेशीबाहेर आले आहेत. पुढचे चार-पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरेच्या हद्दीत गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे.संपूर्ण गाव तेथे एकत्र आल्यामुळे एरव्ही सुनसान असणाऱ्या ठिकाणी गलबलाट सुरू झाला आहे. कडाक्याची थंडी असूनही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर या वार्षिकाचा उत्साह दिसत आहे. साडेचारशे वर्षांपूर्वी सुरू केलेली प्रथा आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडली जात आहे.

शुक्रवारी दुपारीच शिराळेवासीयांनी गावकुसाबाहेर उभारलेल्या राहुट्यांच्या दिशेने पाळीव प्राणी- पक्ष्यांसह पाच-सहा दिवसांचे दाणागोट्याचे गाठोडे घेऊन प्रस्थान केले. वयोवृद्ध, लहान मुले आणि महिला वर्ग साहित्य घेऊन एसटी व खासगी वाहनांनी राहुट्यांकडे पोहोचले. सायंकाळी अंधार पडेपर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते.संपूर्ण गाव एकत्र आल्यामुळे राहुट्यांनजीक एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस गावकरी येथेच वास्तव्य करणार आहेत. गावकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या गुराढोरांसह गावची ‘वेस’ न ओलांडता येथेच वास्तव्य करणार आहेत. शाळा, अंगणवाडी येथेच भरणार आहे.अशा आहेत गावपळणच्या आख्यायिका..साडेचारशे वर्षांपूर्वी घोरीप खेळ करण्यासाठी आलेल्या कुटुंबाचा गावकऱ्यांनी गैरसमजातून वध केला. त्या कुटुंबाने गावकऱ्यांना दिलेल्या शापामुळे गावाचे मोठे नुकसान होऊ लागले. त्यानंतर गावकऱ्यांनी देवाकडे विचारणा केली असता देवाने गावकऱ्यांना काही दिवस गावाबाहेर राहण्यास सांगितले. तिथून गावपळण सुरू असल्याचे सांगितले जाते. तर गावपळणीबद्दल काहींचे मत वेगळे आहे. शिराळे गावात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे त्यातून बचावासाठी लोकांनी स्थलांतर केले गेले. त्यातूनच ही प्रथा पुढे रूढ झाल्याचेही ऐकायला मिळते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग